शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

By admin | Updated: March 9, 2017 01:37 IST

भारतीय खाद्य निगमची अनागोंदी; सव्वीस दिवसांपासून तीस हजार क्विंटल तूर उघड्यावर.

सुहास वाघमारे नांदुरा, दि. ८- पीक पिकविण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शेतकर्‍याला ते हमी भावाने विकण्यासाठीही महिनाभराचा संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दिसून येत आहे. येथे भारतीय खाद्य निगमची तूर खरेदी बारदाना नसल्याचे कारण सांगून बंद पडल्याने मागील सव्वीस दिवसांपासून तीस हजार िक्वंटल तूर आवारात उघड्यावर पडून आहे. तर रात्रंदिवस शेतकरी त्या तुरीच्या गंजीवरच जेवण व झोपून संरक्षण करीत आहेत. तुरीला हमीभावापेक्षा अत्यल्प भाव बाजारपेठेत मिळत असल्याने भारतीय खाद्य निगमने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तुरीची हमीभावाने खरेदी सुरु केली आहे; मात्र सुरुवा तीला दोन ते तीन दिवसच हमिभावाची खरेदी सुस्थितीत होती; मात्र त्यानंतर शेतकर्‍यांच्या नावावर व्यापार्‍यांचा माल विकला जात असल्याची ओरड झाली व त्यातच बारदाना सं पल्याचे सांगून सदर तूर खरेदी खंडित झाली आहे. त्यामुळे मागील १0 फेब्रुवारीपासून शेतकर्‍यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली तूर पडून आहे. आज रोजी सुमारे सव्वीस दिवसात तीस हजार क्विंटल तुरीचा साठा बाजार समिती आवारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला आहे. मागील महिनाभरात जेमतेम पाच ते सात दिवस भारतीय खाद्य निगमचे हे केंद्र सुरळीत सुरु होते व ते फक्त पाचशे ते सातशे क्विंटल माल खरेदी करतात व लगेच बारदाना संपला सांगून बाजार समितीमधून निघून जातात. मागील सव्वीस दिवसांपासून शे तकर्‍यांनी तुरीचा माल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणल्याने शेतकरी त्या मालाच्या सुरक्षिततेसाठी बाजार समिती परिसरातच असतात. रात्रीच्यावेळी त्यांच्या तुरीच्या मालावर जेवण करताना व झोपलेले शेतकरी हे नित्याचेच चित्र आता बाजार समितीमध्ये आहे. ७ मार्चच्या दुपारी ढगाळ वातावरण व पावसाबाबत हवामानाचा अंदाज काहींनी व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी त्यांचा तुरीच्या मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी धावाधाव केली... अन सभापतींनी झाकली तूरढगाळ वातावरणामुळे ७ च्या संध्याकाळी बाजार समितीत शेतकरी पावसापासून संरक्षणासाठी तुरीच्या मालाला प्लास्टिकच्या कापडाने झाकत होते. त्याचवेळी सभापती नीळकंठराव भगत त्यांच्या शेतातील तुरीचा माल झाकत होते. यावेळी त्यांची स्वत:ची तूर त्यांनी १0 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी आणली असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच भारतीय खाद्य निगम खरेदीबाबत गंभीर नसल्याने शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव असल्याचे सांगून याबाबत आमदार चैनसुख संचेती प्रयत्नरत असल्याने बारदाना उपलब्ध होणार आहे.