शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

नांदुरा येथे तीस हजार क्विंटल तूर पडून!

By admin | Updated: March 9, 2017 01:37 IST

भारतीय खाद्य निगमची अनागोंदी; सव्वीस दिवसांपासून तीस हजार क्विंटल तूर उघड्यावर.

सुहास वाघमारे नांदुरा, दि. ८- पीक पिकविण्यासाठी जिवाचे रान करणार्‍या शेतकर्‍याला ते हमी भावाने विकण्यासाठीही महिनाभराचा संघर्ष करावा लागत असल्याची भीषण परिस्थिती नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दिसून येत आहे. येथे भारतीय खाद्य निगमची तूर खरेदी बारदाना नसल्याचे कारण सांगून बंद पडल्याने मागील सव्वीस दिवसांपासून तीस हजार िक्वंटल तूर आवारात उघड्यावर पडून आहे. तर रात्रंदिवस शेतकरी त्या तुरीच्या गंजीवरच जेवण व झोपून संरक्षण करीत आहेत. तुरीला हमीभावापेक्षा अत्यल्प भाव बाजारपेठेत मिळत असल्याने भारतीय खाद्य निगमने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तुरीची हमीभावाने खरेदी सुरु केली आहे; मात्र सुरुवा तीला दोन ते तीन दिवसच हमिभावाची खरेदी सुस्थितीत होती; मात्र त्यानंतर शेतकर्‍यांच्या नावावर व्यापार्‍यांचा माल विकला जात असल्याची ओरड झाली व त्यातच बारदाना सं पल्याचे सांगून सदर तूर खरेदी खंडित झाली आहे. त्यामुळे मागील १0 फेब्रुवारीपासून शेतकर्‍यांनी बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली तूर पडून आहे. आज रोजी सुमारे सव्वीस दिवसात तीस हजार क्विंटल तुरीचा साठा बाजार समिती आवारात शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला आहे. मागील महिनाभरात जेमतेम पाच ते सात दिवस भारतीय खाद्य निगमचे हे केंद्र सुरळीत सुरु होते व ते फक्त पाचशे ते सातशे क्विंटल माल खरेदी करतात व लगेच बारदाना संपला सांगून बाजार समितीमधून निघून जातात. मागील सव्वीस दिवसांपासून शे तकर्‍यांनी तुरीचा माल बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणल्याने शेतकरी त्या मालाच्या सुरक्षिततेसाठी बाजार समिती परिसरातच असतात. रात्रीच्यावेळी त्यांच्या तुरीच्या मालावर जेवण करताना व झोपलेले शेतकरी हे नित्याचेच चित्र आता बाजार समितीमध्ये आहे. ७ मार्चच्या दुपारी ढगाळ वातावरण व पावसाबाबत हवामानाचा अंदाज काहींनी व्यक्त केल्याने शेतकर्‍यांनी त्यांचा तुरीच्या मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी धावाधाव केली... अन सभापतींनी झाकली तूरढगाळ वातावरणामुळे ७ च्या संध्याकाळी बाजार समितीत शेतकरी पावसापासून संरक्षणासाठी तुरीच्या मालाला प्लास्टिकच्या कापडाने झाकत होते. त्याचवेळी सभापती नीळकंठराव भगत त्यांच्या शेतातील तुरीचा माल झाकत होते. यावेळी त्यांची स्वत:ची तूर त्यांनी १0 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी आणली असल्याची माहिती त्यांनी दिली, तसेच भारतीय खाद्य निगम खरेदीबाबत गंभीर नसल्याने शेतकर्‍यांना होणार्‍या त्रासाची जाणीव असल्याचे सांगून याबाबत आमदार चैनसुख संचेती प्रयत्नरत असल्याने बारदाना उपलब्ध होणार आहे.