शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईकांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात ...

बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गाेरसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़ गाेरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण व प्रदेशध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत २४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन विकास कामाला गती देण्यात आली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले, त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय राठोड, प्रा.अरविंद चव्हाण, सुभाष आडे, अनिल पवार, ईश्वर चव्हाण, राजू राठोड, डिगांबर चव्हाण, दिनकर पवार, तेजराव जाधव, प्रेमकुमार राठोड, संतोष जाधव, गजानन चव्हाण, पंडित जाधव, रामकृष्ण राठोडे, बळीराम राठोड, गजानन राठोड, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, पवन जाधव, प्रकाश राठोड, संदीप चव्हाण, महेश राठोड, गोकुळ नाईक, संतोष आडे, फुलसिंग नायक यांच्यासह असंख्य गोरसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.