शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नवी मुंबई विमानतळास वसंतराव नाईकांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST

बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात ...

बुलडाणा : नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट राज्याचे साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गाेरसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़ गाेरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण व प्रदेशध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत २४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन विकास कामाला गती देण्यात आली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले, त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विजय राठोड, प्रा.अरविंद चव्हाण, सुभाष आडे, अनिल पवार, ईश्वर चव्हाण, राजू राठोड, डिगांबर चव्हाण, दिनकर पवार, तेजराव जाधव, प्रेमकुमार राठोड, संतोष जाधव, गजानन चव्हाण, पंडित जाधव, रामकृष्ण राठोडे, बळीराम राठोड, गजानन राठोड, सागर चव्हाण, सचिन चव्हाण, पवन जाधव, प्रकाश राठोड, संदीप चव्हाण, महेश राठोड, गोकुळ नाईक, संतोष आडे, फुलसिंग नायक यांच्यासह असंख्य गोरसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.