शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

मका खरेदीत नाफेडने शेतकऱ्यांना वेठीस धरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

दुसरबीड : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड अंतर्गत होत असलेल्या मका खरेदीमध्ये शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याच्या तक्रारी ...

दुसरबीड : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड अंतर्गत होत असलेल्या मका खरेदीमध्ये शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशी मागणी शिवसेने केली आहे. यासंदर्भात तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, गजेंद्र देशमुख व किनगावराजा युवासेना विभाग प्रमुख लखन देशमुख यांनी सहाय्यक निबंधक व तहसीलदारांना निवेदन देऊन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये नाफेड अंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी केली जाते. यावेळी पोती (बारदाना) मागणी होत नाही. सध्या मक्याची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. तालुक्यात ताडशिवणी येथे मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते. इतरही गावातून मका विक्रीसाठी येतो. या वेळी मका आणण्यासाठी काळ्या धारीच्या पोत्यामध्ये ५० किलोचाच कट्टा आणावा, अशी सक्ती करण्यात येत आहे. याकरीता शेतकऱ्यांना एक क्विंटलसाठी २ पोते लागत असल्याने ६० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यास २५ क्विंटल मका आणावयचा असल्यास १५०० रुपये तोटा किंवा भूर्दंड सोसावा लागतो. कोरोना महामारी, अवकाळी नैसर्गिक संकटे व आर्थिक बिकट परिस्थितीमुळे अगोदरच शेतकऱ्यांची मानसिकता भयावह असताना स्वत:च्या कष्टाने कमविलेल्या मालाची विक्री करताना बारदाना शेतकऱ्यांनीच पुरविण्याची अट जाचक असून या जाचक अटीतून व भूर्दंड यातून शेतकऱ्याची मुक्तता करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.