शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

सध्या कोरोनाचा कहर वाढतच आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना फैलावत असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा ...

सध्या कोरोनाचा कहर वाढतच आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना फैलावत असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. मात्र आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व मंडळींनी सहकार्य करावे तरच लवकर गाव कोरोनामुक्त होईल. त्याकरिता ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन यावेळी आमदार संजय रायमुलकर यांनी केले. या अभियानात ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, बचतगट, तरुण मंडळी, सामाजिक संस्था, पोलीसपाटील, शाळा समिती, ग्रामदक्षता समितीसह गावासाठी धडाडीने पुढे येणाऱ्या मंडळींनी एकत्रितपणे काम करायचे. या मंडळींनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, विनाकारण न फिरणे, लग्नसमारंभ उपस्थिती, नागरिकांचे आजारपण, लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे शाळेत विलगीकरण, कोविड टेस्ट, लसीकरण आदी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांकरिता काम करायचे आहे. हे सर्व गावकऱ्यांनी काळजीपूर्वक केल्यास आपले गाव लवकर कोरोनामुक्त होईल. तेव्हा अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन सभापती दिलीप देशमुख यांनी केले, तर शेवटी गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी अभियानासंदर्भात माहिती दिली. या सभेला जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे, विस्तार अधिकारी शिवाजी गवई, प्रवीण सोनुने, जे.जे. आरू, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, नैसर्गिक आपत्ती विभागाचे राम नवघरे, स्वीय साहाय्यक रूपेश गणात्रा उपस्थित होते.

कोरोनाची त्रिसूत्री पाळा

कोरोनाचा वाढता संसर्ग बघता प्रत्येकाने कोरोनाची त्रिसूत्री पाळावी, असे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले. हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, बाहेर गर्दी न करणे आदी नियमांचे पालन प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.