शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; बोगस डॉक्टर्सवर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

शासकीय आरोग्य केंद्रातील उपचार दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित राहत नसल्यामुळे ऐनवेळी तेथील परिचारिकांनाच उपचार करावा लागतो. ...

शासकीय आरोग्य केंद्रातील उपचार

दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित राहत नसल्यामुळे ऐनवेळी तेथील परिचारिकांनाच उपचार करावा लागतो. अत्यावश्यक रुग्ण आल्यास त्यावर तात्पुरता उपचार करून ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते. साध्या आजारावर मात्र परिचारिकाच औषधी देऊन वेळ निभावून नेत असल्याचेही प्रकार दुर्गम भागात अनेक आरोग्य केंद्रांत दिसून येते आहेत.

तक्रार आली तरच कारवाई

शहरासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. कारवाई किंवा माहिती देण्याचे अधिकार स्थानिक सरंपच किंवा ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच नागरिकांना देखील आहेत. मात्र, कारवाईबाबत कोणीही माहिती देत नाही.

सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ

१. कंपाउंडर करतात रुग्णांवर उपचार

राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात बोगस डॉक्टर शोधमोहिमेचा धडक कृती कार्यक्रम राबवला होता. त्यानंतर बोगस डॉक्टरांवर गुन्हेदेखील नोंदविण्यात आले होते. त्यानंतर काही काळ बोगस डॉक्टर सक्रिय नव्हते. त्यामुळे आता पुन्हा बोगस डॉक्टरांनी डोकेवर काढले आहे. कंपाउंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.

२. दुर्गम भागात प्रमाण अधिक

बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा पदवी नसते. इतर राज्यातील पदवीचे प्रमाणपत्र दवाखान्यात लावण्यात येते. दुर्गम भागातील जनतेवर अघोरी, स्टेरॉइड व विविध प्रकारच्या इंजेक्शन दिले जातात. सरसकट सलाइन लावले जाते. रुग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाहीत, तरी औषधोपचार करतात. परिणामी, निदान न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

३. वेगवेगळ्या पॅथींचे उपचारात मास्टर

विविध पॅथींचा अभ्यास नसतानाही त्या पॅथीची औषधी लिहून देत रुग्णांवर उपचार करण्याचा फंडा अशा डॉक्टरांकडे असतो. पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार, हे कळताच मुन्नाभाई एमबीबीएस डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे. तसेच ग्राम समितीला देखील कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, तसे होत

नाही.

जिल्ह्यात एकूण बोगस डॉक्टर्सवर कारवाई - ००

एकूण शासकीय रुग्णालये : ६८