शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST

९ पालिकांची वर्षअखेर संपणार मुदत : प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयाेगाचे आदेश संदीप वानखडे बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ...

९ पालिकांची वर्षअखेर संपणार मुदत : प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयाेगाचे आदेश

संदीप वानखडे

बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यभरात अनलाॅक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ निर्बंध शिथिल हाेत असताना निवडणुकीची प्रतीक्षा राजकीय पक्षांच्या नेत्याबराेबर नागरिकांनाही हाेती़ निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत़ जिल्ह्यातील ९ नगरपालिकांची मुदत वर्ष अखेरीस संपणार आहे़

काेराेनाचा फटका निवडणुकांनाही बसला आहे़ त्यामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ सध्या काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच निवडणूक आयाेगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे़

जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर नगर पंचायतीची प्रभाग रचना आधीच जाहीर करण्यात आली आहे़, तसेच बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, देऊळगावराजा या पालिकांची मुदत वर्षाच्या शेवटी संपणार आहे़ त्यामुळे या पालकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ हाेणार आहे़

एक सदस्यीय प्रभाग पद्धत राहणार

नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग राहणार आहेत़ त्यामुळे या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांना नव्याने व्यूहरचना आखावी लागणार आहे़

१० ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा

या वर्षात कार्यकाळ संपत असलेल्या १० ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे़; मात्र निवडणुकीची अद्यापही प्रतीक्षा आहे़ काेराेनामुळे ग्रामपंचायत निवडणुकीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ नगर पालिकांसाठी निवडणूक आयाेगाने आदेश दिल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे़

कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दरम्यान मुदत संपत असलेल्या नगर पंचायत आणि नगरपालिकांची प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ त्यानुसार २४ ऑगस्ट राेजी बैठक हाेणार असून, त्यामध्ये याविषयी निर्णय हाेणार आहे़ २०११ च्या लाेकसंख्येचा आधार घेऊन प्रभार रचना करण्यात येणार आहे़

नगर पंचायतींविषयी संभ्रम

जिल्ह्यातील माेताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतच्या प्रभाग रचनेचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे या नगर पंचायतींची पुन्हा प्रभाग रचना हाेणार की नाही, याविषयी संभ्रम आहे़

जिल्ह्यातील एकूण नगरपालिका ११

मुदत संपत असलेल्या नगरपालिका ०९

जिल्ह्यातील नगर पंचायती ०२