शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पालिकेचे हगणदरीमुक्तीचे प्रयत्न निष्फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST

खामगाव :    शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे  खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार  असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा आणि बलाढय़ नगर पालिकेच्या स्वच्छता अभियानाची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात पडली आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची जिल्हास्तरीय तपासणी थंड बस्त्यात!शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :    शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि  राजकीय पदाधिकार्‍यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे  खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार  असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा आणि बलाढय़ नगर पालिकेच्या स्वच्छता अभियानाची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात पडली आहे. खामगाव शहरातील उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी, स्वच्छ  महाराष्ट्र अभियानातंर्गत शहरातील विविध भागातील सर्वेक्षण  करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर पुन्हा फेर सर्वेक्षण करण्यात आले.  यामध्ये   बांधकामासाठी ३२५0 शौचालयांचे  उद्दीष्ट ठरविण्यात  आले. या उद्दीष्टापैकी २७१४ शौचालयांच्यावर शौचालयाचे  बांधकाम पुर्णत्वास आले असून, ५३६ शौचालयाच्या बांधकामाचे  भीजत घोंगडे आहे.  या शौचालयांचे बांधकाम अपूर्ण असल्याने,  पालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीत खोडा निर्माण  झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शौचालयाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी ४७  जणांचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये एका  सदस्यांकडे ४0 जणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पालिकेतील सर्वच विभागातील कर्मचार्‍यांचा या पथकामध्ये समावेश  करण्यात आला असून, यादीचे विक्रेंद्रीकरण प्रत्येकाची जबाबदारी  निश्‍चित करण्यात आली होती. दरम्यान, २0 जून पासून पालिका  प्रशासनाने केलेल्या कडक अंमलजावणीमुळे शहरातील १३ पैकी  १0 ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यास पालिकेला यश आले. मात्र,  बाळापूर फैल, किसन नगर, ओंकारेश्‍वर स्मशानभूमी या ठिकाणी  पालिका प्रशासन हगणदरीमुक्तीसाठी मेटाकुटीस आले आहे. ही  ठिकाणे हगणदरी मुक्तीसाठी पालिका प्रशासनाला नागरिकांसोबतच,  राजकीय पदाधिकार्‍यांकडूनही सहकार्याची अपेक्षा असल्याचे दिसून  येते. जिल्ह्यातील इतर पालिका प्रमाणे खामगाव शहरातील राजकीय  पदाधिकार्‍यांनी मतभेद विसरून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या  उद्दीष्टपूर्ती सहकार्य केल्यास खामगावचे हगणदरीचे स्वप्नं पूर्ण होवू  शकते, एवढे मात्र निश्‍चित!

मंगळवारी एकाची पोलीस स्टेशन वारी!उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमास मंगळवारी चांगलीच किंमत  चुकवावी लागली. सकाळी उघड्यावर शौचास गेलेल्या बाळापूर  फैलातील एका इसमास नगर पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाने  पकडले. या इसमाला सकाळीच पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले.   शहर पोलिस स्टेशनमध्ये या इसमाविरोधात कारवाई करण्यात आली.  ही कारवाई खामगाव नगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता तथा  आरोग्य पर्यवेक्षक नीरज नाफडे, आरोग्य निरिक्षक अनंत निळे, गुड  माँर्निंग पथक प्रमुख एस.के.देशमुख,  सुभाष शेळके, मोहन अहीर  यांनी केली.

..तर संपूर्ण परिवारावर कारवाई!खामगाव शहरातील ३ ठिकाणे हगणदरीमुक्तीसाठी पालिका  प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. परिणामी,  मेटाकुटीस आलेल्या पालिका प्रशासनाने उघड्यावरील हगणदरी  रोखण्यासाठी, कठोर निर्णय घेतला आहे. खामगाव पालिका हद्दीत  उघड्यावर शौचास जाताना आढळून आल्यास, त्या इसमाच्या संपूर्ण  परिवारावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी  धनंजय बोरीकर यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत नियुक्त  केलेल्या ४७ कर्मचार्‍यांना उघड्यावरील हगणदरी रोखण्या कामी  कुठलिही कुचराई खपवून घेतल्या जाणार नाही, असे सक्त निर्देश  दिले आहेत.

जिल्हास्तरीय समितीने दर्शविली होती निराशा! १९ मे रोजी खामगाव शहराची जिल्हा स्तरीय समितीकडून पाहणी  करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन अधिकारी उदय कुरवलकर  यांनी तपासणी पथकाचे नेतृत्व केले होते. यावेळी अनेक बाबींवर  समाधान व्यक्त करण्यात आले असले तरी, काही बाबींबाबत प थकाने निराशा व्यक्त केली होती. दरम्यान, पथकाने सुचविलेल्या उ पाययोजनांमध्ये पालिका प्रशासनाकडून योग्य अंमलबजावणी  करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे खामगाव पालिकेची  जिल्हा स्तरीय तपासणी थंडबस्त्यात असल्याची धक्कादायक बाब  समोर आली आहे. 

क्वालिटी कंट्रोलच्या निकषास पात्र!खामगाव नगर पालिकेची स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत जिल्हा स् तरीय तपासणी रखडली असली तरी, स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत  शौचालय निर्मितीत पालिकेने ८१ टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे.  खामगाव नगर पालिकेने शौचालय निर्मितीत पूर्ण केलेले उद्दीष्ट हे  जिल्ह्यातील इतर पालिकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यामुळे ‘ क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया’च्या निकषास खामगाव नगर पालिका  पात्र ठरली आहे.

हगणदरीमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज! स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसोबतच उघड्यावरील  हगणदरी रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात  आहे. मात्र, शहरातील नागरिकांकडून या मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद  मिळत असल्याचे दिसून येते. सामाजिक संस्थांचाही स्वच्छ महाराष्ट्र  अभियानात अपेक्षीत प्रतिसाद नसल्याची वस्तुस्थिती असून,  राजकीय पदाधिकार्‍यांकडून या अभियानाकडे कानाडोळा केल्या जा त आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर स्वच्छ आणि हगणदरी मुक्त  करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि  नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाल्याची चर्चा होत  आहे.