शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

डाेणगाव येथे डासांचा उपद्रव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

बसेस बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण जानेफळ : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त ...

बसेस बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

जानेफळ : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहन चालकांनी भाडेवाढ केली आहे.

इंधन वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली

सुलतानपूर : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.

रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

बुलडाणा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयाच्या आवारात भंगार वाहने

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागासमाेर भंगार साहित्य व वाहने पडून आहेत. या वाहनांनी बरीच जागा व्यापली आहे. तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या आवारातही भंगार झालेली वाहने पडून असल्याचे चित्र आहे.

अहवालास विलंब, काेराेना रुग्णांमध्ये वाढ

माेताळा : येथील कोविड केंद्रातून स्वॅब घेतलेल्या व्यक्तींचा अहवाल प्राप्त होण्यासाठी सहा ते सात दिवसांचा अवधी लागत आहे. त्यामुळे संसर्गित येणाऱ्या व्यक्तीही इतर लोकांप्रमाणे जनमानसात व परिवारात वावरत आहेत. ही बाब इतरांसाठी धोकादायक ठरत आहे.

गुरे चाेरणारी टाेळी सक्रिय

देऊळगाव मही: भुरट्या चोरट्यांनी आता आपला मोर्चा गुरांकडे वळविला आहे. येथील शेतकऱ्याची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार

सिंदखेड राजा : उन्हाळ्याची चाहूल लागली असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वॉटर एटीएमचा आधार मिळत आहे. मात्र वॉटर एटीएममध्ये टाकण्यासाठी नाण्यांची गरज असून, सध्या नाण्यांचा तुटवडा भासत आहे.

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

किनगाव जट्टू : परिसरातील वसंत नगर, देवा नगर शिवारात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहींचा कळप रात्रंदिवस पिकामध्ये मुक्त संचार करीत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे.

सौर पथदिवे बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष

बुलडाणा: रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा म्हणून बहुतांश गावात शासनाच्या विविध योजनांद्वारे सौरउर्जेवरील पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. देखभालीअभावी हे पथदिवे बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही सौरपथदिव्यांमधील बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

दिव्यांगांचा निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष

बुलडाणा : दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयाप्रमाणे दरवर्षी पाच टक्के निधी ग्रामपंचायतने खर्च करायचा असतो; परंतु ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांपासून दिव्यांग बांधवांचा निधी खर्च केलेला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दिव्यांग बांधव शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत.