शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोफत प्रवेशासाठी जागेपेक्षा अर्ज जास्त

By admin | Updated: June 30, 2017 00:29 IST

१५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज : अर्जदारांचे ड्रॉ बाकीच!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आरटीई अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पश्चिम विदर्भात १० हजार ८०६ जागा असून, त्यासाठी १५ हजार ५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; मात्र मोफत प्रवेशासाठी जागेपक्षा अर्ज जास्त आलेले असतानाही व शाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ड्रॉची प्रक्रिया बाकीच आहे. शिक्षण हक्क कायद्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबविण्यात आली; परंतु शाळा सुरू होऊनही ही प्रक्रिया अपूर्णच आहे. अमरावती विभागामध्ये १० हजार ८०६ जागेसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, याचा लाभ घेण्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून १५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरावर ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेश पक्रिया राबविण्यात आली; मात्र मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ड्रॉ काढण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध अडचणी येत असल्याने अनेक प्रवेश अद्यापही बाकी आहेत. मोफत प्रवेशासाठी अमरावती विभागातून १५ हजार ५६ अर्ज आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून २ हजार २८५ अर्ज, अकोला जिल्ह्यात ३ हजार ४६७ , अमरावती जिल्ह्यात ५ हजार ३६०, वाशिम जिल्ह्यात ७५१ व यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार १९३ अर्ज आलेले आहेत. २७ जूनला शाळा सुरू झाल्या आहे. बुलडाणा जिल्ह्यात केवळ दोनच ड्रॉआरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच वेळेस ड्रॉ काढण्यात आले; परंतु इतर जिल्ह्यांमध्ये पाच ते सहा वेळेस ड्रॉ काढून मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला; मात्र बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असूनही ड्रॉ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.