शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मूग उत्पादकांना दुहेरी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:56 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  

ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा ८00 रूपये कमी दराने खरेदी मुगाची आवक घटली

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  यावर्षी खरीप हंगामात मुगासह उडीद, योयाबीनची पेरणी  झाल्यानंतर पावसाचा दीर्घ खंड पडला होता. यामुळे वाढीच्या  परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला. फूलगळ  झाल्यामुळे शेंगा लागल्या नाहीत. काही ठिकाणी विरळ प्रमाणात  शेंगा लागल्या. अनेक भागात एकरी एक क्विंटलपेक्षाही कमी उ तारा आला आहे.दीर्घ खंडानंतर ऐन काढणीच्या कालावधीत पावसाने दमदार  हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतशिवारात पाणी साचून  चिखल तयार झाला होता. अशा साचलेल्या पावसात भिजून  शेंगांना मोड फुटले होते. शेंगा भिजल्यामुळे मूग, उडिदाचे दाणे  डागील झाले आहेत; मात्र या पावसाचा सोयाबीन पिकाला काही  प्रमाणात फायदा झाला होता.

मुगाची आवक घटलीबुलडाणा कृषी उपन्न बाजार समितीमध्ये सध्या मुगाची आवक  घटली आहे. मागील महिन्यात मुगाची आवक वाढली होती;  मात्र आता जवळपास २५ क्विंटल आहे, तर भाव ४७00 ते  ४८00 पर्यंत आहे. उडिदाची आवक सुरू असून, दररोज  जवळपास १00 क्विंटल माल येत आहे. त्याला ४ हजार ते  ४१00 पर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय सोयाबीनची आवक  वाढली असून, दररोज १ हजार क्विंटल माल बाजार समितीत ये त आहे. त्यात सोयाबीनची ओल पाहून भाव देण्यात येत आहे.  सध्या २७00 ते २८00 रूपये भाव देण्यात येत आहे.

ऑक्शन हॉलमध्ये अंधारबुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्यांच्या यार्डवरील  ऑक्शन हॉलमध्ये कोणतीही विजेची व्यवस्था नसल्यामुळे  संध्याकाळी उशिरा आलेला माल अंधारात उतरवावा लागतो.  याठिकाणी विजेची व्यवस्था करण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार  समितीचे आहे; मात्र या समस्येकडे कृषी उत्पन्न बाजार समिती  दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधितांनी लक्ष  देऊन ऑक्शन हॉलमध्ये विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी  होत आहे.