शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:55 IST

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांचा आरोपदेशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील पत्रकार भवनात १४ ऑगस्ट रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. शेट्टी  म्हणाले, की लोकसभा निवडणूक काळात एनडीएचे  उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध  आश्‍वासने दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव  देण्यात येईल, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी  करण्यात येईल आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता.  मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेतकर्‍यांना कोणत्याच  प्रकारचा न्याय दिला नाही. देशात दाळवर्गीय उत्पादन  वाढले असताना परदेशातून डाळ आयात करण्यात आली.  या धोरणामुळे शेतकर्‍यांना बाजार भाव मिळाला नाही.  राज्यातही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन  देण्यात आले होते. मात्र कर्जमाफी करताना विविध अटी  लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना  न्याय मिळाला नाही. यावर्षी पाऊस नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यावर  दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  दिलास द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या  सरकार दरबारी मांडाव्यात यासाठी विदर्भाचा दौरा आयोजि त केला आहे. यावेळी कर्जमाफीच्या अटी मान्य नाहीत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून न्याय  द्यावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे  खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग  महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, गजानन पाटील बंगाळे, मयूर बोर्डे आदी उ पस्थित होते. 

देशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना देशव्यापी स्तरावर न्याय  मिळण्यासाठी अखील भारतीय किसान समन्वय समितीच्या  माध्यमातून देशातील विविध भागातील १६0 शेतकर्‍यांच्या  संघटना एकत्र येणार आहेत. येणार्‍या हिवाळी  अधिवेशनादरम्यान अखील भारतीय किसान समन्वय समि तीच्या माध्यमातून १0 लाख शेतकरी एकत्र येणार आहेत.  अशा चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे  आवश्यक असल्याचेही खा. राजू शेट्टी यांनी सांगि तले.याचवेळी राज्यातील सत्तेत सहभाग ही केवळ औ पचारिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.