शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:55 IST

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांचा आरोपदेशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील पत्रकार भवनात १४ ऑगस्ट रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. शेट्टी  म्हणाले, की लोकसभा निवडणूक काळात एनडीएचे  उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध  आश्‍वासने दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव  देण्यात येईल, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी  करण्यात येईल आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता.  मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेतकर्‍यांना कोणत्याच  प्रकारचा न्याय दिला नाही. देशात दाळवर्गीय उत्पादन  वाढले असताना परदेशातून डाळ आयात करण्यात आली.  या धोरणामुळे शेतकर्‍यांना बाजार भाव मिळाला नाही.  राज्यातही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन  देण्यात आले होते. मात्र कर्जमाफी करताना विविध अटी  लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना  न्याय मिळाला नाही. यावर्षी पाऊस नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यावर  दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  दिलास द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या  सरकार दरबारी मांडाव्यात यासाठी विदर्भाचा दौरा आयोजि त केला आहे. यावेळी कर्जमाफीच्या अटी मान्य नाहीत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून न्याय  द्यावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे  खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग  महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, गजानन पाटील बंगाळे, मयूर बोर्डे आदी उ पस्थित होते. 

देशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना देशव्यापी स्तरावर न्याय  मिळण्यासाठी अखील भारतीय किसान समन्वय समितीच्या  माध्यमातून देशातील विविध भागातील १६0 शेतकर्‍यांच्या  संघटना एकत्र येणार आहेत. येणार्‍या हिवाळी  अधिवेशनादरम्यान अखील भारतीय किसान समन्वय समि तीच्या माध्यमातून १0 लाख शेतकरी एकत्र येणार आहेत.  अशा चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे  आवश्यक असल्याचेही खा. राजू शेट्टी यांनी सांगि तले.याचवेळी राज्यातील सत्तेत सहभाग ही केवळ औ पचारिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.