शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकर्‍यांना न्याय न देणारे मोदी खोटारडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:55 IST

बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला.

ठळक मुद्देखासदार राजू शेट्टी यांचा आरोपदेशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून  शेतकर्‍यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे  आश्‍वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्‍यांना  हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला. येथील पत्रकार भवनात १४ ऑगस्ट रोजी आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. शेट्टी  म्हणाले, की लोकसभा निवडणूक काळात एनडीएचे  उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध  आश्‍वासने दिली. यावेळी शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चावर आधारीत हमी भाव  देण्यात येईल, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी  करण्यात येईल आदी आश्‍वासनांचा त्यात समावेश होता.  मात्र निवडणुकीनंतर त्यांनी शेतकर्‍यांना कोणत्याच  प्रकारचा न्याय दिला नाही. देशात दाळवर्गीय उत्पादन  वाढले असताना परदेशातून डाळ आयात करण्यात आली.  या धोरणामुळे शेतकर्‍यांना बाजार भाव मिळाला नाही.  राज्यातही शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन  देण्यात आले होते. मात्र कर्जमाफी करताना विविध अटी  लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना  न्याय मिळाला नाही. यावर्षी पाऊस नसल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यावर  दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  दिलास द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्या  सरकार दरबारी मांडाव्यात यासाठी विदर्भाचा दौरा आयोजि त केला आहे. यावेळी कर्जमाफीच्या अटी मान्य नाहीत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करून न्याय  द्यावा, या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे  खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग  महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, गजानन पाटील बंगाळे, मयूर बोर्डे आदी उ पस्थित होते. 

देशभरात शेतकरी एकत्र येणे आवश्यक !शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना देशव्यापी स्तरावर न्याय  मिळण्यासाठी अखील भारतीय किसान समन्वय समितीच्या  माध्यमातून देशातील विविध भागातील १६0 शेतकर्‍यांच्या  संघटना एकत्र येणार आहेत. येणार्‍या हिवाळी  अधिवेशनादरम्यान अखील भारतीय किसान समन्वय समि तीच्या माध्यमातून १0 लाख शेतकरी एकत्र येणार आहेत.  अशा चळवळीच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे  आवश्यक असल्याचेही खा. राजू शेट्टी यांनी सांगि तले.याचवेळी राज्यातील सत्तेत सहभाग ही केवळ औ पचारिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.