शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श

By admin | Updated: October 30, 2014 23:35 IST

अतिशय संवेदनशील असलेल्या मंदिर-मशीद अशा पवित्र स्थळांवर धार्मिक एकात्मता.

बुलडाणा : ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घे तला असता, एकात्मतेचे मूर्तिमंत आदर्श उदाहरण समोर आले आहे. धार्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या मंदिर-मशीद अशा पवित्र स्थळांवर धार्मिक एकात्मता गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची येथील परंपरा आहे, ही बाब जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे. अशाच सौहार्दपुर्ण बुलडाणा जिल्ह्यातील दुर्लक्षित भागांचा मागोवा भोनमध्ये मुस्लिमेतरांचा मोहरमसंग्रामपूर तालुक्याच्या दुर्गम भागात व पूर्णेच्या काठावर वसलेले भोन या गावाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भोनमध्ये मुस्लिम समाजाचे एकही घर नसताना दरवर्षी मोहरमच्या दिवशी लवलाटबाबाची पालखी (सवारी) निघते. मुस्लिमेतर लोकच ही सवारी सजवितात. या सवारीचे नेतृत्व गावातील भोई समाजाकडे असते. दरवर्षी मोहर्रमच्या दिवशी हजारो भाविक भक्ताचे पाय भोनकडे आपसूकच वळू लागतात.जयपूरमध्ये एकत्र नांदतात ह्यराम आणि रहिमह्णमोताळा तालुक्यातील जयपूर या तीन हजार लोकवस्तीच्या गावाने हिंदू-मुस्लिम एकतेचे आगळेवेगळे उदाहरण देत ह्यराम आणि रहिमह्ण गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात, हे गेल्या ५५ वर्षांपासून दाखवून दिले आहे. जयपूर गावातील हनुमान मंदिर व मशीद हे जवळ जवळ असूनही कधी भेदाभेदाची स्थिती निर्माण झाली नाही. विशेष म्हणजे, रमजानात या ठिकाणी हिंदू बांधवांकडून उपवास (रोजे) ठेवले जातात. देऊळगावमहीत मंदिर-मशीद घडवताहेत एकतेचे दर्शन!देऊळगांवमही येथे शेजारी-शेजारी असलेले महादेव मंदिर, गणपती मंदिर व मशीद हिंदू-मुस्लिम समाजामध्ये एकोपा निर्माण करणारे ठरले आहे. दोन समुदायांतील हे ऐक्य मंदिर-मशिजीमुळेच शक्य झाले असून, येथील नागरिकांनी जा तीय सलोखा आणि भाईचारा कायम ठेवल्याने भांडणतंट्यांना जागाच उरली नाही. दोन्ही धार्मिक स्थळांची भिंत एकच असून, या भिंतीला अविश्‍वासाचा तडा कोणीच जाऊ दिला नाही. शहापूर येथील निपाणीबाबांचा ऐतिहासिक दर्गाखामगाव : बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या शहापूर या गावाला पुरातन इतिहास लाभला आहे. मन, तोरणा व उतावळी या तीन नद्यांचा संगम येथे होतो. येथील निपाणीबाबा यांच्या दग्र्यावर दरवर्षी हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने उर्स (यात्रा) साजरा केला जातो. निपाणीबाबांचा हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला आहे. इ.स. १६00 ते १७00 दरम्यान औरंगजेबाचा पुत्र मुराद याचे राज्य या परिसरात होते. राजपुत्र मुराद हा शहापूर निवासी असताना त्याने आपले राज्य वाढविण्यासाठी शहापूर-दस्तापूर-कदमापूर या मार्गे बाळापूर येथील किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार केला होता. उर्सच्या अगोदरच्या रात्री बाबांचा संदल काढला जातो. भाविकांची येथे दर्शनासाठी वर्दळ असते.