शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जि. प. समोर अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:39 IST

ग्रामीण रस्त्यांच्या दुरवस्था साठी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचा ठपकाही मनसेच्या आंदोलकांनी ठेवला आहे. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही ...

ग्रामीण रस्त्यांच्या दुरवस्था साठी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचा ठपकाही मनसेच्या आंदोलकांनी ठेवला आहे. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेने हे आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दोन हजार किमी लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे रस्ते खराब झालेले आहेत. त्यांची त्वरेने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख मदन राजे गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे, शहराध्यक्ष मनोज पवार, शहर उपाध्यक्ष अनिल माेरे, योगेश विसपुते, अंकित मिसाळ, विजय पडोळ, राहुल चौधरी, उमेश नाटेकर, प्रेम सोनोने, बाळराजे देशमुख, राजू मांटे, गजानन टेकाळे, शिवचरण खोंड, अनिल वाघमारे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी ही केली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांना निवेदन देऊन या प्रश्नी त्यांच्याशी चर्चाही करण्यात आली.

--पीक विम्यासाठी ही आंदोलन --

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानाचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे हा पीक विमा मिळावा अशी मागणीही मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत करण्यात आले. यावेळी सोयाबीनच्या झाडांची माळ गळ्यात घालून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली.