शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी पेनटाकळी सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : शंतनू बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:41 IST

शंतनु बोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे, माजी मंत्री भारत ...

शंतनु बोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे व मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून आपण पेनटाकळी प्रकल्पाच्या ४१६ कोटी रुपयांच्या सुप्रमा मान्यतेच्या प्रश्नाचा पाठपुरवठा करीत होतो व त्याला यश प्राप्त झाले; मात्र चिखलीच्या आमदारांनी या प्रश्नी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे प्रसिद्धीपत्रक काढल्याने पेनटाकळी प्रकल्पाच्या ४१६ कोटी रुपयांच्या सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये असा सल्ला दिला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा, जिगाव, पेनटाकळी, ब्राह्मणवाडा, करडी, मासरूळ, शिवनी आरमाळ यासारखे असंख्य प्रकल्प भारतभाऊंनी त्या काळामध्ये मंजूर करून घेतले व त्यांच्या कामाचा पाठपुरवठा करून बहुतांशी कामे पूर्णत्वास नेली, तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पेनटाकळी प्रकल्पातील नायगाव खुर्द, नायगाव बु.,पेनसावंगी, कासारखेड, पिंपळगाव उंडा यासारख्या अनेक गावांचे पुनर्वसन शेतकरी व नागरिकांना कुठलीही अडचण येऊ न देता मार्गी लावले. आता राहिला प्रश्न पांढरदेव, घानमोड-मानमोड, देवदरी या गावांच्या पुनर्वसनाचा, या कामासाठी चिखली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी मागील वर्षी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, ही बाब अभिनंदनीय असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद यात्रेदरम्यान या पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांसमवेत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली तेव्हा त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले व त्यांनी या प्रश्नावर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने त्यांनी सूचना दिल्या. दरम्यान, मुंबई येथे सचिवांची त्रिस्तरीय बैठक सुरू होण्याअगोदर ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील दूरध्वनीद्वारे सचिवांशी चर्चा केली होती. दरम्यान, बैठकीनंतर पेनटाकळी प्रकल्पाच्या सुप्रमास मंजुरी मिळाली, असेही शेवटी शंतनू बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.