शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

अनुराधा अर्बन बँकेला सहकार मंत्रालयाकडून ‘क्लिन चिट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST

बँकेविरोधातील तक्रार सुडबुध्दीने व राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा निर्वाळा चिखली : सन २००८ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत अनुराधा ...

बँकेविरोधातील तक्रार सुडबुध्दीने व राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा निर्वाळा

चिखली : सन २००८ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत अनुराधा अर्बन बँकेने अपहार केल्याबाबतची तक्रार; बोगस, बनावट व सूडबुध्दीने तथा राजकीय हेतूने प्रेरित तसेच बेकायदा असल्याचा निर्वाळा देत सहकार व पणन मंत्रालयाने अनुराधा बँकेविरोधातील तक्रार खारीज करीत प्रकरण निकाली काढले आहे. याबाबतचे आदेश सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी ११ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

सहकार मंत्रालयाकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर अनुराधा अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संपर्क कार्यालयाने यासंदर्भाने एक प्रसिध्दिपत्रक जारी केले आहे. सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने तक्रारकर्ते तोंडघशी पडल्याची टीका या प्रसिध्दिपत्रकाव्दारे करण्यात आली आहे. यामध्ये पुढे म्हटले आहे की, सन २००८ मध्ये युपीए सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. अनुराधा अर्बन बँकेने सचोटीने आणि पारदर्शकपणे शेतकरी बांधवांच्या खात्यात कर्जमाफीतून मिळालेला त्यांच्या हक्काचा पैसा जमा केला होता. दरम्यानच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांनी एकही तक्रार केली नव्हती. लेखापरीक्षणामध्ये एकही आक्षेप आलेला नव्हता, तर सहकार विभागाने कर्जमाफीसंदर्भात केलेल्या तब्बल ७ तपासण्यांमध्ये कुठेही साधा एक आक्षेपदेखील नोंदविला नसताना तब्बल १३ वर्षांनंतर अनुराधा अर्बनच्या कर्जमाफीमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा जावई शोध लावत भोरसा येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली. यावरून चिखलीच्या आमदारांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लावला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार श्वेता महाले यांनी अनुराधा बँकेने कोट्यवधींचा घोटाळा केला असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही करण्याची मागणी कुठल्याही पुराव्याशिवाय केली. यानुषंगाने सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर योग्य त्या कारवाईचे विधानसभेत जाहीर केले होते.

सहकार मंत्र्यांकडे दाखल हाेते अपील

आ. महाले यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरही नाखूश होऊन आणखी एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली. त्यावरून अनुराधा अर्बन बँकेने सहकार मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सहकार मंत्र्यांनी ११ ऑगस्ट रोजी निर्णय दिला आहे. सदर आदेशातील निरीक्षण व अनुमानामध्ये त्यांनी अनुराधा अर्बन बँकेने सन २००८च्या कर्जमाफीमध्ये कुठलीही अनियमितता केली नसल्याचे स्पष्ट उल्लेख करीत निधीच्या अपयोजनेचा तर प्रश्नच येत नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे नोंदविले आहे़