शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

अनुराधा अर्बन बँकेला सहकार मंत्रालयाकडून ‘क्लिन चिट’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST

बँकेविरोधातील तक्रार सुडबुध्दीने व राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा निर्वाळा चिखली : सन २००८ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत अनुराधा ...

बँकेविरोधातील तक्रार सुडबुध्दीने व राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा निर्वाळा

चिखली : सन २००८ मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत अनुराधा अर्बन बँकेने अपहार केल्याबाबतची तक्रार; बोगस, बनावट व सूडबुध्दीने तथा राजकीय हेतूने प्रेरित तसेच बेकायदा असल्याचा निर्वाळा देत सहकार व पणन मंत्रालयाने अनुराधा बँकेविरोधातील तक्रार खारीज करीत प्रकरण निकाली काढले आहे. याबाबतचे आदेश सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी ११ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत.

सहकार मंत्रालयाकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर अनुराधा अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संपर्क कार्यालयाने यासंदर्भाने एक प्रसिध्दिपत्रक जारी केले आहे. सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने तक्रारकर्ते तोंडघशी पडल्याची टीका या प्रसिध्दिपत्रकाव्दारे करण्यात आली आहे. यामध्ये पुढे म्हटले आहे की, सन २००८ मध्ये युपीए सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. अनुराधा अर्बन बँकेने सचोटीने आणि पारदर्शकपणे शेतकरी बांधवांच्या खात्यात कर्जमाफीतून मिळालेला त्यांच्या हक्काचा पैसा जमा केला होता. दरम्यानच्या काळात कोणत्याही शेतकऱ्यांनी एकही तक्रार केली नव्हती. लेखापरीक्षणामध्ये एकही आक्षेप आलेला नव्हता, तर सहकार विभागाने कर्जमाफीसंदर्भात केलेल्या तब्बल ७ तपासण्यांमध्ये कुठेही साधा एक आक्षेपदेखील नोंदविला नसताना तब्बल १३ वर्षांनंतर अनुराधा अर्बनच्या कर्जमाफीमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा जावई शोध लावत भोरसा येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली. यावरून चिखलीच्या आमदारांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न लावला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आमदार श्वेता महाले यांनी अनुराधा बँकेने कोट्यवधींचा घोटाळा केला असल्याने संचालक मंडळावर कार्यवाही करण्याची मागणी कुठल्याही पुराव्याशिवाय केली. यानुषंगाने सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी चौकशी समितीच्या अहवालानंतर योग्य त्या कारवाईचे विधानसभेत जाहीर केले होते.

सहकार मंत्र्यांकडे दाखल हाेते अपील

आ. महाले यांनी त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरही नाखूश होऊन आणखी एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली. त्यावरून अनुराधा अर्बन बँकेने सहकार मंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सहकार मंत्र्यांनी ११ ऑगस्ट रोजी निर्णय दिला आहे. सदर आदेशातील निरीक्षण व अनुमानामध्ये त्यांनी अनुराधा अर्बन बँकेने सन २००८च्या कर्जमाफीमध्ये कुठलीही अनियमितता केली नसल्याचे स्पष्ट उल्लेख करीत निधीच्या अपयोजनेचा तर प्रश्नच येत नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे नोंदविले आहे़