शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

By admin | Updated: September 13, 2016 02:49 IST

खामगाव तालुकातील धरणांची स्थिती महिनाभरापासून पावसाची दडी; तोरणा प्रकल्पात घट.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : यावर्षी सुरुवातीला दमदार सुरुवात झालेल्या पावसाने ऑगस्टपासून दडी मारली. त्यामुळे तालुक्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. गत महिन्यातील अन् आजचा प्रकल्पातील जलसाठा यामध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. दमदार पावसाअभावी जलसाठय़ातील अपेक्षित वाढ थांबली आहे.खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, मस व ढोरपगाव हे मध्यम प्रकल्प तर बोरजवळा, गारडगाव, टाकळी, पिंप्री गवळी व लांजुड लघू प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षात पावसाची सरासरी कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वाढलाच नाही. खरिपाच्या पिकांना अत्यल्प पावसाचा फटका तर रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी नाही, अशा विदारक परिस्थितीत शेतकरी अडकला. यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासून पावसाळा समाधानकारक राहिला. पेरणी करून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी चांगले उत्पन्न निघण्याची आशा होती; मात्र ऐन पिके बहरण्याच्या वेळेस पावसाने दडी मारली. या दडीचा परिणाम शेतीबरोबर धरणातील जलसाठय़ाला बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने जलसाठय़ात वाढ दिसून आली. १३ ऑगस्ट रोजी मन प्रकल्पात ६३.६२ टक्के (२३.४३ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये महिन्यानंतर सद्यस्थितीत केवळ ३ टक्के जलसाठा वाढला आहे. सध्याचा जलसाठा ६६.९८ टक्के (२४.६६ दलघमी) आहे. तोरणा प्रकल्पाने तर ५0 टक्केही पाणी पातळी ओलांडली नाही. सद्यस्थितीत तोरणामध्ये ३७.९१ टक्के (२.९९ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा जलसाठा ३८.४३ टक्के (३.0३ दलघमी) होता. ढोरपगाव प्रकल्पात ८३.५२ टक्के (४.९४ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये सध्या ८६.९९ टक्के (५.0८ दलघमी) जलसाठा आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्प परिसरात यावर्षी सर्वाधिक कमी पावसाची नोंद आहे. ज्ञानगंगा परिसरात आतापर्यंत २५0 मि.मी. पावसाची नोंद असून, धरणात ४३.८६ टक्के (१४.८८ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी ही नोंद ४१.८२ टक्के (१४.१९ दलघमी) एवढी होती. तालुक्यातील मस हा प्रकल्प १00 टक्के भरलेला आहे. ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पातून १३ ऑगस्ट रोजी ५ सेंमी पाण्याचा विसर्ग सुरू होता. यातील जलसाठा १00 टक्के कायम आहे. लघू प्रकल्प बोरजवळामध्ये ५६.१0 टक्के जलसाठा आहे, तर गारडगाव ८९.७६ टक्के, टाकळी ८७.८६ टक्के, लांजुड ७४.२२ टक्के तर पिंप्री गवळीमध्ये १00 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील वाढ न होता थांबलेला जलसाठा चिंतेचा विषय बनला आहे. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होऊन धरणाच्या पाणीपातळीत १00 टक्के वाढ होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.