शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ात अत्यल्प वाढ!

By admin | Updated: September 13, 2016 02:49 IST

खामगाव तालुकातील धरणांची स्थिती महिनाभरापासून पावसाची दडी; तोरणा प्रकल्पात घट.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. १२ : यावर्षी सुरुवातीला दमदार सुरुवात झालेल्या पावसाने ऑगस्टपासून दडी मारली. त्यामुळे तालुक्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. गत महिन्यातील अन् आजचा प्रकल्पातील जलसाठा यामध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून येते. दमदार पावसाअभावी जलसाठय़ातील अपेक्षित वाढ थांबली आहे.खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा, मस व ढोरपगाव हे मध्यम प्रकल्प तर बोरजवळा, गारडगाव, टाकळी, पिंप्री गवळी व लांजुड लघू प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षात पावसाची सरासरी कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वाढलाच नाही. खरिपाच्या पिकांना अत्यल्प पावसाचा फटका तर रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी नाही, अशा विदारक परिस्थितीत शेतकरी अडकला. यामुळे शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासून पावसाळा समाधानकारक राहिला. पेरणी करून बसलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी चांगले उत्पन्न निघण्याची आशा होती; मात्र ऐन पिके बहरण्याच्या वेळेस पावसाने दडी मारली. या दडीचा परिणाम शेतीबरोबर धरणातील जलसाठय़ाला बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात व ऑगस्ट सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने जलसाठय़ात वाढ दिसून आली. १३ ऑगस्ट रोजी मन प्रकल्पात ६३.६२ टक्के (२३.४३ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये महिन्यानंतर सद्यस्थितीत केवळ ३ टक्के जलसाठा वाढला आहे. सध्याचा जलसाठा ६६.९८ टक्के (२४.६६ दलघमी) आहे. तोरणा प्रकल्पाने तर ५0 टक्केही पाणी पातळी ओलांडली नाही. सद्यस्थितीत तोरणामध्ये ३७.९१ टक्के (२.९९ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी हा जलसाठा ३८.४३ टक्के (३.0३ दलघमी) होता. ढोरपगाव प्रकल्पात ८३.५२ टक्के (४.९४ दलघमी) जलसाठा होता. यामध्ये सध्या ८६.९९ टक्के (५.0८ दलघमी) जलसाठा आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्प परिसरात यावर्षी सर्वाधिक कमी पावसाची नोंद आहे. ज्ञानगंगा परिसरात आतापर्यंत २५0 मि.मी. पावसाची नोंद असून, धरणात ४३.८६ टक्के (१४.८८ दलघमी) जलसाठा आहे. महिनाभरापूर्वी ही नोंद ४१.८२ टक्के (१४.१९ दलघमी) एवढी होती. तालुक्यातील मस हा प्रकल्प १00 टक्के भरलेला आहे. ओव्हरफ्लो झालेल्या या प्रकल्पातून १३ ऑगस्ट रोजी ५ सेंमी पाण्याचा विसर्ग सुरू होता. यातील जलसाठा १00 टक्के कायम आहे. लघू प्रकल्प बोरजवळामध्ये ५६.१0 टक्के जलसाठा आहे, तर गारडगाव ८९.७६ टक्के, टाकळी ८७.८६ टक्के, लांजुड ७४.२२ टक्के तर पिंप्री गवळीमध्ये १00 टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील वाढ न होता थांबलेला जलसाठा चिंतेचा विषय बनला आहे. सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस होऊन धरणाच्या पाणीपातळीत १00 टक्के वाढ होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.