शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

खर्च लाखांत, अनुदान मात्र हजारांवर!

By admin | Updated: April 3, 2017 03:22 IST

राष्ट्रीय फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी केवळ २५ टक्केच अनुदान.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. २- पारंपरिक उत्पादन पद्धतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकर्‍यांचा विकास साधण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन धोरणातून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते. परंतु महागाईच्या काळात फलोत्पादन यांत्रिकीकरणातील घटकांसाठी खर्च तीन लाखांच्यावर येत असतानाही अनुदान केवळ ७५ हजार रुपयांपर्यंतच मिळते. राष्ट्रीय फलोत्पादन धोरणातून तुटपुंजे अनुदान मिळत असल्याने शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेणे परवडत नाही. शेतकर्‍यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व त्यांचा विकास साधण्यासाठी शासन स्तरावरून शेतकर्‍यांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. पारंपरिक उत्पादन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड घालून शेतकर्‍यांच्या उत्पादनात भर पाडण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हाती घेण्यात आले आहे. उत्पादन, काढणीत्तोर हाताळणी, प्रक्रिया व पणन यामध्ये संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित करून त्यांच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे. तसेच उच्च मूल्यांकित पिके घेण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांमध्ये प्रचार करून पॅक हाऊस, रायपनिंग चेंबर, शीतगृह, नियंत्रित वातावरणातील साठवणूक गृह या सारख्या सुविधा तसेच मूल्यवृद्धीसाठी प्रक्रिया आणि सुविधा स्थापन करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. मात्र, महागाईच्या काळात हे अर्थसहाय्य तुटपुंजे असल्याने शेतकर्‍यांना ही योजना परवडत नसल्याचे दिसून येते. फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असताना अनुदान मात्र हजारांवर मिळत आहे. फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकातील ट्रॅक्टर-२0 बी.एच.पी.पर्यंत घेण्यासाठी तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र, यासाठी केवळ ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकर्‍यांसाठी खर्चाच्या ३५ टक्के म्हणजे १ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच पावर टिलर-८ अश्‍वशक्तीपेक्षा कमी यासाठी १ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असताना अनुदान केवळ ४0 हजार रुपये मिळते. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकर्‍यांसाठी ५0 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. कांदा चाळीसाठीही शासनाकडून अनुदान देण्यात येते. २५ मे.टन कांदा चाळीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असताना केवळ ८७ हजार ५00 रुपये अनुदान दिले जाते. त्याचबरोबर पॅक हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, हरित गृह आदींसाठी ५0 टक्केपेक्षाही कमी अनुदान मिळत आहे. महागाईच्या काळात खर्च वाढत असतानाही अनुदान मात्र तेवढय़ावरच राहत असल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या या योजनांकडे पाठ फिरवली आहे. फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकासाठी सहाय्यराष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, २५ कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्रकल्प सन २0१७-१८ मध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत निधीचे वाटप जिल्हा किंवा तालुकानिहाय करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पांतर्गत सन २0१६-१७ व सन २0१७-१८ मध्ये नव्याने खरेदी करण्यात येणार्‍या यंत्रसामग्रीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकासाठी २५ कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच फलोत्पादन यांत्रिकीकरणाच्या घटकासाठी २५ टक्के अनुदान देण्यात येते. मात्र, नवीन धोरणानुसार यामध्ये वाढ होऊ शकते. - प्रमोद लहाळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बुलडाणा.