सुधीर चेके पाटील / चिखली (बुलडाणा) : विदर्भातील शेतकर्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्र म सुरू करण्यात आला आहे; मात्र या योजनेंतर्गत शेतकर्यांना ठिबक व तुषार संच खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान गत दोन वर्षांंपासून कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभार व लालफीतशाहीत अडकले असून, जिल्हय़ातील २८ हजार १७६ शेतकर्यांचे एकूण ८७ कोटी ८१ लाख रुपये शासनाकडे थकले आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील ३ हजार ३७१ लाभार्थी शेतकर्यांचे ५ कोटी ४२ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान थकले असल्याने सलग चार वष्रे दुष्काळ, त्यात कर्ज काढून या योजनेचा लाभ घेतला असल्याने सद्य:स्थितीत लाभार्थी शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. विदर्भात सलग दुसर्यांदा पावसाचा खंड पडला असून, पिकांना संरक्षित ओलीत करण्यासाठी, ठिबक, तुषार संचाची गरज आहे; परंतु हे संच खरेदी करण्यासाठी सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीमध्ये ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करता यावा, यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार १८६ लाभार्थी शेतकर्यांचे सन २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षाची एकूण ८७ कोटी ८१ लाख एवढी प्रचंड अनुदानाची रक्कम कृषी विभागाकडे थकीत आहे. यामध्ये चिखली तालुक्यात सन २0१३-१४ मध्ये ठिबकचे ४६ शेतकर्यांचे १६ लाख २७ हजार, तर स्प्रिंकलरच्या १ हजार ७५ शेतकर्यांचे १ कोटी ४६ लाख २0 हजार रुपये आणि सन २0१४-१५ मध्ये ठिबकच्या २४0 शेतकर्यांचे ७८ लाख ७२ हजार तर स्प्रिंकलरच्या २ हजार १0 शेतकर्यांचे ३ कोटी १ लाख ५0 हजार रुपये असे एकूण ३ हजार ३७१ शेतकर्यांचे ५ कोटी ४२ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागाकडे रखडले आहे. शेतीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने अनुदानावर ठिबक व तुषार सिंचन संच पुरविण्यास सुरुवात केली. अनुदानावर संच उपलब्ध होऊन शेतीला पाण्याची व्यवस्था होत असल्याने जिल्हय़ातील हजारो शेतकर्यांनी कृषी खात्याकडे प्रस्ताव सादर केले. सुरुवातीला अनुदान वाटण्यातही आले; परंतु आता शासनानेच यासाठी हात आखडता घेतला आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान थकले
By admin | Updated: November 22, 2015 02:45 IST