शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लग्नपत्रिकेतून दिला जलसंधारणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:09 IST

धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे.

- नवीन मोदे

धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे. जलसंवर्धनासाठी संपूर्ण गावच आता झपाटल्यागत काम करत असून त्यातंर्गतच आता थेट लग्नपत्रिकेतही जलसंधारणाच्या विषयाला या गावात प्राधान्य दिल्या गेले आहे.  ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण या युक्तीवर’ विश्वास न ठेवता आधि केले मग सांगितले याप्रमाणे मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) वासियांनी ग्रामविकासाची लोकचळवळ राबवून जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार बनविले. आता जलसंधारणाच्या प्रसाराचा व प्रचाराचा विडा जणू गावकºयांनी उचलला असून लग्नपत्रिकेसह इतर पत्रिकेच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहचविला जात आहे. मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव कायम दुष्काळी पट्टा, अशी गावाची ओळख. सरपंच विमल कदम यांच्या नेतृत्वात गावकरी एकवटले, निमित्त झाले वॉटर कप स्पर्धेचे. जिद्द, परिश्रम व एकीच्या जोरावर गावकºयांनी वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिका पर्यंत मजल मारली आणि पहिल्याच पावसात गाव पाणीदार बनले. अशक्यप्राय वाटणारी कामगिरी पार पाडल्यामुळे गावकरी भारावले. आता आपल्या गावातील गावकºयांच्या कर्तृत्वाची व केलेल्या पराक्रमाची इतरांना माहिती व्हावी, जलसंधारणाच्या कामाचा प्रसार व्हावा व ईतरांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, यासाठी गावकरी स्वयंप्रेरणेने पुढे सरसावले. लग्नपत्रिकेसह ईतर पत्रिकेतून गावातील जलसंधारणाच्या फोटोसह संदेश दिला जात आहे. सिंदखेड गावातील मनोहर गडाख यांचा मुलगा गजानन याचा विवाह २७ मार्च रोजी सिंदखेड येथे पार पडणार आहे. या लग्नाची पत्रिका जलसंधारणाच्या संदेशात व्यापून गेली आहे. त्यामध्ये वॉटर कप स्पर्धेत गावाची राज्यस्तरीय कामगिरी, शेततळे, जलसंधारणाची कामे, वृृक्षारोपन व वृक्षसंगोपन यामुळे हिरवागार झालेला परिसर याची छायाचित्रासह माहिती दिली आहे. 

प्रेरणादायी उपक्रमआपल्या गावाची यशोगाथा मांडण्याच्या व त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा गावकºयांचा प्रयत्न आहे. फक्त प्रसिध्दीसाठी इतरांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वत: केले मग इतरांना सांगितले. यामुळे सिंदखेड (प्रजा) वासियांच्या प्रयत्नाचे मोल, महत्त्व व वेगळेपण अधोरेखीत होते. 

 एकी व नेकीच्या जोरावर गावकºयांनी जलक्रांती केली. त्यामधून इतरांना प्रेरणा मिळावी, कारण काहीही अशक्य नाही, हा संदेश महत्त्वाचा आहे. -प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते सिंदखेड (प्रजा).

टॅग्स :buldhanaबुलडाणा