शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लग्नपत्रिकेतून दिला जलसंधारणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:09 IST

धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे.

- नवीन मोदे

धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे. जलसंवर्धनासाठी संपूर्ण गावच आता झपाटल्यागत काम करत असून त्यातंर्गतच आता थेट लग्नपत्रिकेतही जलसंधारणाच्या विषयाला या गावात प्राधान्य दिल्या गेले आहे.  ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण या युक्तीवर’ विश्वास न ठेवता आधि केले मग सांगितले याप्रमाणे मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) वासियांनी ग्रामविकासाची लोकचळवळ राबवून जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार बनविले. आता जलसंधारणाच्या प्रसाराचा व प्रचाराचा विडा जणू गावकºयांनी उचलला असून लग्नपत्रिकेसह इतर पत्रिकेच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहचविला जात आहे. मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव कायम दुष्काळी पट्टा, अशी गावाची ओळख. सरपंच विमल कदम यांच्या नेतृत्वात गावकरी एकवटले, निमित्त झाले वॉटर कप स्पर्धेचे. जिद्द, परिश्रम व एकीच्या जोरावर गावकºयांनी वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिका पर्यंत मजल मारली आणि पहिल्याच पावसात गाव पाणीदार बनले. अशक्यप्राय वाटणारी कामगिरी पार पाडल्यामुळे गावकरी भारावले. आता आपल्या गावातील गावकºयांच्या कर्तृत्वाची व केलेल्या पराक्रमाची इतरांना माहिती व्हावी, जलसंधारणाच्या कामाचा प्रसार व्हावा व ईतरांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, यासाठी गावकरी स्वयंप्रेरणेने पुढे सरसावले. लग्नपत्रिकेसह ईतर पत्रिकेतून गावातील जलसंधारणाच्या फोटोसह संदेश दिला जात आहे. सिंदखेड गावातील मनोहर गडाख यांचा मुलगा गजानन याचा विवाह २७ मार्च रोजी सिंदखेड येथे पार पडणार आहे. या लग्नाची पत्रिका जलसंधारणाच्या संदेशात व्यापून गेली आहे. त्यामध्ये वॉटर कप स्पर्धेत गावाची राज्यस्तरीय कामगिरी, शेततळे, जलसंधारणाची कामे, वृृक्षारोपन व वृक्षसंगोपन यामुळे हिरवागार झालेला परिसर याची छायाचित्रासह माहिती दिली आहे. 

प्रेरणादायी उपक्रमआपल्या गावाची यशोगाथा मांडण्याच्या व त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा गावकºयांचा प्रयत्न आहे. फक्त प्रसिध्दीसाठी इतरांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वत: केले मग इतरांना सांगितले. यामुळे सिंदखेड (प्रजा) वासियांच्या प्रयत्नाचे मोल, महत्त्व व वेगळेपण अधोरेखीत होते. 

 एकी व नेकीच्या जोरावर गावकºयांनी जलक्रांती केली. त्यामधून इतरांना प्रेरणा मिळावी, कारण काहीही अशक्य नाही, हा संदेश महत्त्वाचा आहे. -प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते सिंदखेड (प्रजा).

टॅग्स :buldhanaबुलडाणा