शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

डॉक्टरसह चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:17 IST

खामगाव :  स्थानिक नांदुरा रोडस्थित अरबट एक्स रे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राजेश अरबट यांच्यासह चार जणांवर १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉक्टरसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे

ठळक मुद्देनांदुरा रोडस्थित अरबट एक्स रे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राजेश अरबट १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  स्थानिक नांदुरा रोडस्थित अरबट एक्स रे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राजेश अरबट यांच्यासह चार जणांवर १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉक्टरसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, खामगावची १८ वर्षीय युवती डॉ. राजेश अरबट यांच्या हॉस्पिटलमध्ये मागील एक महिन्यापासून काम करीत आहे. तिला याच हॉस्पिटलमधील काम करणारे दीपक अवचार, वैभव देशमुख, महेंद्र गावंडे हे अश्लील हावभाव करून तिचा छळ करीत होते. या संदर्भात तिने डॉ. अरबट यांना याबाबत माहिती दिली असता, त्यांनी यावर कारवाई न करता उलट त्या युवतीला प्रपोज करीत तिच्या लज्जेस ठेच पोहोचवली. या प्रकरणात युवतीने बुधवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. राजेश अरबट, दीपक अवचार, वैभव देशमुख, महेंद्र गावंडे यांच्या विरुद्ध भादंवि  ३५४ (अ), ५0९, ३४ कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डॉ. राजेश अरबट आणि वैभव देशमुख यांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुलभा ढोले करीत आहेत.                       -

गोरगरिबांना दरमहा हजारो रुपयांची वीज देयके रिडिंग घेणार्‍यांमुळे होत आहे गोंधळकंत्राटदार व अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सध्या सर्वसामान्य गोरगरीब नागरिक त्रस्त झाले आहेत. गरीबांचा विजेचा वापर कमी असतानाही दरमहा हजारो रुपयांची विज बिले देण्यात येत आहेत. मात्र धनदांडग्या, श्रीमंताचा विज वापर जास्त असतांना त्यांना तुरळक बिले देण्यात येत आहेत. हा सर्व प्रकार विज बिल कंत्राटदार व स्थानिक विज वितरण अधिकारी यांचेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने होत आहे. परंतु यामुळे गोरगरीबांना विनाकारण आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे.मेहकर शहरासह ग्रामीण भागात विज मिटरचे हजारो ग्राहक आहेत. ज्यांच्या घरी फक्त एक लाईट व फॅन आहे. विजेचा अतिशय कमी वापर आहे, त्यांना महिन्याकाठी दोन ते अडीच हजार रुपये बिल आकारण्यात येत आहे. तर याउलट ज्याचा विजेचा वापर मोठय़ा प्रमाणात असताना त्यांना अतिशय कमी बिले देण्यात येतात. गरीबांना जास्त बिले आले की, सदर बिल कमी करण्यात त्यांना विज कंपनी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. ग्रामीण भागातील ग्राहकांना तर आपली मोलमजुरी बुडवून एसटीचे भाडे खर्च करुन मेहकरला अथवा त्या-त्या गावच्या विज कार्यालयात जावे लागते. एखाद्या गरीब लाभार्थ्याला जर ५ ते ६ हजार रुपये बिल आले तर त्यांचे नाममात्र १ ते दिड हजार रुपये तात्पुरते कमी करुन देण्यात येते. त्यानंतर दुसर्‍या महिन्यात परिस्थिती जैसे थेच राहते. हा प्रकार सतत सुरु असल्याने गोरगरीब जनता  परेशान झाली आहे. यासंदर्भात विज वितरण कंपनीकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात येतात. मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरु असल्याने कारवाई कधीच होत नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी व गोरगरीब जनता त्रस्त आहे. अशा बिकट स्थितीमध्ये जादा येणार्‍या बिलामुळे शेतकरी व गरीब  कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.