शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

लक्ष्मणराव भटकर यांचे चिखलीत स्मारक बांधावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:36 IST

बुलडाणा : घटना समितीचे सदस्य तथा बुलडाणा जिल्ह्याचे तब्बल १६ वर्षे खासदार राहिलेल्या लक्ष्मणराव भटकर यांचे चिखली येथे स्मारक ...

बुलडाणा : घटना समितीचे सदस्य तथा बुलडाणा जिल्ह्याचे तब्बल १६ वर्षे खासदार राहिलेल्या लक्ष्मणराव भटकर यांचे चिखली येथे स्मारक बांधावे, अशी मागणी कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष ॲड. कृष्णा इंगळे यांनी २२ ऑगस्ट राेजी पत्रकार परिषदेत केली़

कृष्णा इंगळे यांनी यावेळी सांगितले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळी घटना समिती नेमायची हाेती. त्यासाठी लक्ष्मणराव भटकर हे बुलडाणा जिल्ह्यातून घटना समितीवर निवडून आले हाेते, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधून निवडून आले हाेते़ त्यानंतर डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले़ घटना समितीचे सदस्य असलेल्या लक्ष्मणराव भटकर यांची राज्य घटनेवर स्वाक्षरी आहे़ त्यामुळे एवढा माेठा माणूस हाेेणे हे चिखलीवासीयांच्या भाग्याची गाेष्ट आहे़ त्यानंतर ते खासदार हाेते़ एवढेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्रातून महाराष्ट्र वेगळा झाला त्यासाठी नागपूर करार करण्यात आला़ या करारावरही भटकर यांची स्वाक्षरी आहे़ त्यामुळे त्यांचे चिखलीत भव्य स्मारक हाेणे आवश्यक आहे़ त्यासाठी चिखलीचे नगराध्यक्ष तसेच आमदार यांना पत्र लिहिल्याचेही इंगळे यांनी यावेळी सांगितले़

मेव्हणा राजा येथे संत चाेखामेळांचे स्मारक मंजूर

देउळगाव राजा तालुक्यातील मेव्हणा राजा हे संत चाेखामेळा यांचे मूळ गाव. शिवाजीराव माेघे हे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ठिकाणासाठी १ नाेव्हेंबर २०२१ राेजी समिती स्थापन केली हाेती़ त्या समितीचा सदस्य असताना जिल्ह्यातील दाेन स्थळांचा विकास करण्याचे मी सुचवले हाेते़ मेव्हणा राजा येथील संत चाेखामेळांच्या स्मारकासाठी ५१ लाख ८२ हजार ३२४ रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ लवकरच या स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार आहे, असेही इंगळे यांनी सांगितले़

पातुर्डा येथील स्मारकासाठी एक काेटीचा निधी

डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा येथील स्मारकासाठी जवळपास एक काेटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे़ स्मारकाचे काम अंतिम टप्यात आहे़ लवकरच या स्मारकाचे काम पूर्ण हाेऊन उद्घाटन हाेणार आहे़ बाबासाहेबांनी २९ मे १९२९ राेजी पातुर्डा येथे भेट दिली हाेती़ त्यामुळे हे गाव अतिशय महत्त्वाचे आहे़ या गावात स्मारकासाठी शासनाने ९९ लाख ९२ हजार हजार रुपये मंजूर केले आहेत़