शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

उघड्यावर शौचास जाणा-या १७० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाºया जवळपास १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांना न.प.च्या भरारी पथकाचा चाप बसत आहे.आपले घर, परिसर व ...

ठळक मुद्देमेहकर नगरपालिकेचे गुड मॉर्निंग पथक सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाºया जवळपास १७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांना न.प.च्या भरारी पथकाचा चाप बसत आहे.आपले घर, परिसर व शहर स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्यसुद्धा निरोगी व सुदृढ राहावे, यासाठी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा, तसेच उघड्यावर कोणीही शौचास बसू नये, अशा शासनाच्या सक्त सूचना आहेत. तर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून वेळप्रसंगी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येत आहे. मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन नियोजनबद्ध पद्धतीने व युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृतीसुद्धा करण्यात आली. तर आता गुडमार्निंग पथकाचे ४ भरारी पथक नेमून अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली रतन शिरपूरकर, संतोष राणे, सुधीर सारोळकर, पवन भादुपोता, पाठक प्रमुख आदींच्या समावेश आहे.हे भरारी पथक सकाळी ५ वाजतापासून दिवसभर व रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरून उघड्यावर शौचास बसणाºया व नियमांचे उल्लंघन करून अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाइ करीत आहे.आतापर्यंत १७० जणांवर कारवाई करण्यात आली असून, स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहकार्य करून आपलाच परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी अशोक सातपुते यांनी यावेळी केले.उघड्यावर शौचास बसणा-याला गुलाबपुष्पमेहकर पंचायत समितीच्यावतीने गटविकास अधिकारी आर.पी. पवार, अशोक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात गुडमार्निंग पथक राबवून उघड्यावर शौचास बसणाºयावर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी बरटाळा, चिंचोली बोरे, दादुलगव्हाण या गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास बसणाºयाला गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी मार्गाने त्यांचे स्वागत करून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी स्वच्छता अभियानामध्ये दत्तात्रय मगर, ग्रामसेवक भगवान काळे, कैलास वानखेडे, एम.आर. पाटील, सरंपच अरुण दळवी, गजानन सावंत, सुमंता बोरे आदी सहभागी झाले आहेत.