शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

मेहकर भूमी सुपोषण ही जनचळवळ व्हावी- हर्षल सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

मेहकर : भूमी सुपोषण ही जनचळवळ व्हावी. ती आजच्या काळाची गरज आहे, असे विचार स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक ...

मेहकर : भूमी सुपोषण ही जनचळवळ व्हावी. ती आजच्या काळाची गरज आहे, असे विचार स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक हर्षल सोमण यांनी मांडले.

वर्षप्रतिपदा हा वसुधा निर्मितीचा प्रथम दिवस असल्याने त्यानिमित्ताने भूमातेच्या पूजनाचे विविध कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले होते. आपापल्या शेतांमध्ये शेतकरी बांधवांनी भूमातेचे पूजन केले. त्यानंतर ऑनलाईन मार्गदर्शन करताना हर्षल सोमण बोलत होते.

शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. जैविक शेती करून जमिनीचा कस कसा वाढेल, याची काळजी घेणे आवश्यक आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती रोगराईला आमंत्रण देणारी ठरली आहे. भूमी सुपोषण अभियानाची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपल्या संस्कृतीप्रमाणे पृथ्वी ही आपली माता आहे. आपण तिचे पुत्र आहोत. आपल्या मातेचे शोषण आपल्याकडून होता कामा नये. पाश्चात्त्य विचार हा शोषणाचा आहे. तर भारतीय विचार हा दोहनाचा आहे. आपण आपल्या भूमातेकडून आवश्यक तेव्हढेच घेऊ आणि तिचे पोषण करू हा संकल्प या निमित्ताने सर्वांनी करावा असे आवाहन यावेळी हर्षल सोमण यांनी केले. या कार्यक्रमात मेहकर येथे हर्षल सोमण यांनी त्यांच्या शेतात भूमातेचे सपत्नीक पूजन केले. लोणार तालुक्यात बिबी येथे अरविंद चव्हाण यांनी शेतात तलावातील गाळ उपसून टाकून भूमी सुपोषण व पूजन कृतियुक्त केले. अंत्री देशमुख या गावी देशमुख यांनी जैविक खतांसोबत भूमिपूजन केले. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा येथे सीताराम काळे यांनी गोमातेसह भूमिपूजन केले. तर रायपूर येथे शिवप्रसाद थुट्टे यांनी कुंटुंबीयासोबत भूमिपूजन केले. या सर्व ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक स्वदेशी जागरण मंचाचे जिल्हा सहसंयोजक पंकज किंबहुने यांनी केले.