शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विकासाबाबत नगराध्यक्षा बोंद्रे यांनी विरोधकांना चीत केले : धृपदराव सावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकासदेखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगर परिषदेच्या पिचवर आपल्या ...

चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकासदेखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगर परिषदेच्या पिचवर आपल्या चौफेर फटकेबाजीने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. त्यांनी धावांच्या डोंगराप्रमाणे जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, तो सर करणे विरोधकांना कदापिही शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी येथे केले.

युवा नेते कुणाल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. दत्ता पैठणकर स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच नगराध्यक्षा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन धृपतराव सावळे व माजी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुरेशआप्पा खबुतरे, शिवाजीराव बनसोडे, मंगेश व्यवहारे, संजय चेके पाटील, राजू जावळे, काशीनाथ बोंद्रे, नंदकिशोर सावडतकर, अतहर काझी, कपिल खेडेकर, शहजाद, न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, जि.प.सदस्या डॉ.ज्योती खेडेकर, रामदास देव्हडे, सुरेंद्र पांडे, अनिल पळसकर, पंडितराव देशमुख, राजू गवई, गोपाल देव्हडे, शेखर बोंद्रे, अ‍ॅड. राजपाल बडगे, नगरसेवक प्रकाश शिंगणे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विमल देव्हडे, नामू गुरुदासानी, दीपक खरात, मो.आसीफ, अ.रऊफ, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पप्पू राजपूत, अमोल खेडेकर, मनोज खेडेकर, संजय गायकवाड, रहीम पठाण, सुरेंद्र ठाकूर, राजू कुलकर्णी, खालील बागवान, गोविंद कोठारी, नासीर सौदागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान येत्या काही महिन्यांत नगर परिषदेची निवडणूक घोषित होणार असल्याने आता हाती राहिलेल्या महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेट न खेळता २०/२० सारखे खेळावे लागणार असून, या वेळात जास्तीत जास्त विकास निधी शासनाकडून खेचून आणण्याचे काम करावे लागणार असल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन गणेश धुंधळे यांनी केले.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक

: नगराध्यक्षा बोंद्रे

जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे, आजची पिढी ही मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यात जास्त व्यस्त असते. याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असल्याने मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.