शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वीर पत्नीने उभारले शहीद पतीचे स्मारक

By admin | Updated: January 26, 2015 00:55 IST

चिखली तालुक्यातील शेलूद येथे शहीद दिलीप जाधव यांच्या स्मारकाचे आज प्रजासत्ताकदिनी होणार लोकार्पण.

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा):देशसंरक्षणार्थ जम्मू-काश्मीर भागातील कुपवाडा येथे १८ मे २000 साली कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या तालुक्यतील शेलूद येथील दिलीप जाधव यांचे स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिली होती; मात्र या घटनेला तब्बल १४ वष्रे उलटूनही शहीद दिलीप जाधव यांच्या स्मारकाचा वनवास संपला नाही. अखेर वीर पत्नी मीनाबाई जाधव यांनी स्वत:च्या खर्चातून स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या प्रजासत्ताकदिनी होत आहे. स्वत:चा जीव क्षणोक्षणी धोक्यात टाकून कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा वा वणव्यासारखे ऊन. याची पर्वा न करता पोलादी छाती पुढे करून देश संरक्षणार्थ जिल्हय़ातील आतापर्यंत तब्बल २६ जवांनानी देशासाठी बलिदान दिले आहे. या शहिदांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी ठिकठिकाणी ह्यशहीद स्मारकंह्ण उभारली जातात; परंतु दुर्दैवाने बुलडाणा जिल्हय़ामध्ये दोन स्मारकांचा अपवाद वगळता असा प्रयत्न होताना दिसून येत नाही. मध्यंतरी बुलडाणा जिल्हा परिषदेने शहिदांची स्मारके बांधण्यासंदर्भाने ठराव घेतला होता; मात्र पुढे त्याबाबत सातत्य राहिले नाही. त्यामुळे या शहिदांच्या स्मृती व त्यांच्या शौर्याची प्रेरणा येणार्‍या पिढीला होत राहावी यासाठी आता त्यांच्या परिवारानेच पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. चिखली तालुक्यातील शेलूद येथील मीनाबाई दिलीप जाधव या वीर पत्नीने प्रशासनाकडून स्मारक बांधल्या जाण्याची तब्बल १४ वर्षे वाट पाहल्यानंतर पदरी निराशाच पडल्याने पदरमोड करून दीड लाख रुपयांचे शहीद दिलीप जाधव यांचे स्मारक उभारले असून, त्याचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी होत आहे. येणार्‍या पिढीला शहीद दिलीप जाधव यांची शौर्यगाथा कळावी, त्यांच्यापासून ते प्रेरित व्हावे, यासाठी त्यांनी स्मारक बांधण्यासाठी पदरमोड करण्याचा निर्णय घेऊन कोणावरही अवलंबून न राहता तब्बल दीड लाख रुपये खचरून शेलूद येथे शहीद दिलीप जाधव यांचे लक्षवेधी स्मारक उभारून शासन-प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.