सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा):देशसंरक्षणार्थ जम्मू-काश्मीर भागातील कुपवाडा येथे १८ मे २000 साली कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या तालुक्यतील शेलूद येथील दिलीप जाधव यांचे स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिली होती; मात्र या घटनेला तब्बल १४ वष्रे उलटूनही शहीद दिलीप जाधव यांच्या स्मारकाचा वनवास संपला नाही. अखेर वीर पत्नी मीनाबाई जाधव यांनी स्वत:च्या खर्चातून स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या प्रजासत्ताकदिनी होत आहे. स्वत:चा जीव क्षणोक्षणी धोक्यात टाकून कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा वा वणव्यासारखे ऊन. याची पर्वा न करता पोलादी छाती पुढे करून देश संरक्षणार्थ जिल्हय़ातील आतापर्यंत तब्बल २६ जवांनानी देशासाठी बलिदान दिले आहे. या शहिदांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी ठिकठिकाणी ह्यशहीद स्मारकंह्ण उभारली जातात; परंतु दुर्दैवाने बुलडाणा जिल्हय़ामध्ये दोन स्मारकांचा अपवाद वगळता असा प्रयत्न होताना दिसून येत नाही. मध्यंतरी बुलडाणा जिल्हा परिषदेने शहिदांची स्मारके बांधण्यासंदर्भाने ठराव घेतला होता; मात्र पुढे त्याबाबत सातत्य राहिले नाही. त्यामुळे या शहिदांच्या स्मृती व त्यांच्या शौर्याची प्रेरणा येणार्या पिढीला होत राहावी यासाठी आता त्यांच्या परिवारानेच पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. चिखली तालुक्यातील शेलूद येथील मीनाबाई दिलीप जाधव या वीर पत्नीने प्रशासनाकडून स्मारक बांधल्या जाण्याची तब्बल १४ वर्षे वाट पाहल्यानंतर पदरी निराशाच पडल्याने पदरमोड करून दीड लाख रुपयांचे शहीद दिलीप जाधव यांचे स्मारक उभारले असून, त्याचा लोकार्पण सोहळा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी होत आहे. येणार्या पिढीला शहीद दिलीप जाधव यांची शौर्यगाथा कळावी, त्यांच्यापासून ते प्रेरित व्हावे, यासाठी त्यांनी स्मारक बांधण्यासाठी पदरमोड करण्याचा निर्णय घेऊन कोणावरही अवलंबून न राहता तब्बल दीड लाख रुपये खचरून शेलूद येथे शहीद दिलीप जाधव यांचे लक्षवेधी स्मारक उभारून शासन-प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
वीर पत्नीने उभारले शहीद पतीचे स्मारक
By admin | Updated: January 26, 2015 00:55 IST