शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातही मराठा समाजाने बांधली एकीची वज्रमूठ!

By admin | Updated: September 5, 2016 00:47 IST

पहिलीच बैठक ठरली विक्रमी; २६ सप्टेंबरला निघणार क्रांती मोर्चा.

बुलडाणा, दि. ४ : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व समाजहिताच्या मागण्यांसाठी औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी या शहरात मराठा समाज बांधवांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चानंतर आता बुलडाण्यातही मराठा समाज एकवटला आहे. केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून कोणत्याही निमंत्रणाविना रविवार, ४ सप्टेंबरला कला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समाजबांधवांची विक्रमी उपस्थिती होती. या विक्रमी बैठकीत येत्या २६ सप्टेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. कोपर्डी येथील घटनेच्या निषेर्धात राज्यभर मराठा समाज एकवटतो आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ही एकीची ज्योत रविवारी नियोजन बैठकीच्या माध्यमातून पेटली. कोणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता केवळ व्हॉटस् अँप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठकीची माहिती देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनंतर एवढय़ा कमी कालावधीत या बैठकीसाठी समाजबांधव विक्रमी संख्येने उपस्थित होते. खासदार, माजी मंत्री, मराठा समाजाचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्ष, आजी, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिंंनी, महिला प्रतिनिधींचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. २६ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही समाजाच्या, पक्षाच्या किंवा शासन, प्रशासनाच्या विरोधात नसून, मराठा समाजाच्या एकत्वासाठी आणि न्याय हक्कासाठी राहील, ही भूमिका या बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आली. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. काही मिनिटांतच जमला लाखोंचा निधी ! मोर्चासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने समाजातून वर्गणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्गणीचे आवाहन करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची वर्गणी जमा झाली; परंतु सदर निधी हा कुणाजवळ जमा न करता बँकेमध्ये एक संयुक्त खाते उघडून त्यामध्ये जमा करावा आणि नंतर त्या संपूर्ण रकमेचा हिशेब सर्वांंसमोर मांडावा, असे ठरले. महिलांची उपस्थिती ठरणार लक्षवेधीबैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांंनी सहपरिवार मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला. ह्यपाटील मोर्चात आणि पाटलीनबाई घरीह्ण अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समाजाच्या एकोप्यासाठी घराघरांतील महिलांनीही या मोर्चात सहभागी होण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या मोर्चातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरण्याचे संकेत या बैठकीत मिळाले.