शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

बुलडाण्यातही मराठा समाजाने बांधली एकीची वज्रमूठ!

By admin | Updated: September 5, 2016 00:47 IST

पहिलीच बैठक ठरली विक्रमी; २६ सप्टेंबरला निघणार क्रांती मोर्चा.

बुलडाणा, दि. ४ : कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ व समाजहिताच्या मागण्यांसाठी औरंगाबाद, उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि परभणी या शहरात मराठा समाज बांधवांच्या रेकॉर्डब्रेक मोर्चानंतर आता बुलडाण्यातही मराठा समाज एकवटला आहे. केवळ सोशल मीडियावरील माहितीवरून कोणत्याही निमंत्रणाविना रविवार, ४ सप्टेंबरला कला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला समाजबांधवांची विक्रमी उपस्थिती होती. या विक्रमी बैठकीत येत्या २६ सप्टेंबर रोजी विशाल मोर्चा काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. कोपर्डी येथील घटनेच्या निषेर्धात राज्यभर मराठा समाज एकवटतो आहे. बुलडाणा जिल्ह्यातही ही एकीची ज्योत रविवारी नियोजन बैठकीच्या माध्यमातून पेटली. कोणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता केवळ व्हॉटस् अँप व फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून बैठकीची माहिती देण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनंतर एवढय़ा कमी कालावधीत या बैठकीसाठी समाजबांधव विक्रमी संख्येने उपस्थित होते. खासदार, माजी मंत्री, मराठा समाजाचे सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी जि.प. अध्यक्ष, आजी, माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, विद्यार्थिंंनी, महिला प्रतिनिधींचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. २६ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा कुठल्याही समाजाच्या, पक्षाच्या किंवा शासन, प्रशासनाच्या विरोधात नसून, मराठा समाजाच्या एकत्वासाठी आणि न्याय हक्कासाठी राहील, ही भूमिका या बैठकीच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आली. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. काही मिनिटांतच जमला लाखोंचा निधी ! मोर्चासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने समाजातून वर्गणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्गणीचे आवाहन करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो रुपयांची वर्गणी जमा झाली; परंतु सदर निधी हा कुणाजवळ जमा न करता बँकेमध्ये एक संयुक्त खाते उघडून त्यामध्ये जमा करावा आणि नंतर त्या संपूर्ण रकमेचा हिशेब सर्वांंसमोर मांडावा, असे ठरले. महिलांची उपस्थिती ठरणार लक्षवेधीबैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांंनी सहपरिवार मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला. ह्यपाटील मोर्चात आणि पाटलीनबाई घरीह्ण अशी परिस्थिती उद्भवू नये आणि समाजाच्या एकोप्यासाठी घराघरांतील महिलांनीही या मोर्चात सहभागी होण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या मोर्चातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरण्याचे संकेत या बैठकीत मिळाले.