शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST

ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले

राजू पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजरा सुलतानपूर गावाच्या सत्ता  केंद्राकडे लागून असतात. तर सुलतानपूरचे सरपंचपद हे  मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्तापित  इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  मागासवर्गीयमधील अनेक चेहरे बाशिंग बांधून आपली  योग्यता पटवून सांगताना दिसत आहे. यावेळेस सुलतानपूरची  वार्ड संख्या सहा झाली असून, सदस्य संख्या १७ झाली  आहे. त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष असणार आहेत. त्यामुळे  अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद दाखवून महिलांसह  निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज  भरण्यासाठी १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने  अनेकांनी मतदार याद्या आणून मतदारांच्या भेटीसाठी सुरू  केल्या आहेत; मात्र पूर्वीच्या वार्डाची तोडफोड होऊन येथे  वार्ड रचना तयार केली गेली असल्याने या वेळेसच्या  निवडणुकीत मागील अंदाज निकामी ठरणार आहेत. त्यामुळे  विजयाचे गणित अवघड असल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी युवक वर्ग मोठय़ा ताकदीने ग्रामपंचायत सत्ताकारणा त सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जाते. तर  गावातील ज्येष्ठ पुढारी पार्टीचालकसुद्धा नव्या  परंतु  प्रामाणिक व होतकरू चेहर्‍याचा शोध घेत आहेत. सरपंच  पद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने जो-तो आपल्या  गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी तयारी करीत आहे. म तदार मात्र दिवसेंदिवस चांगलाच हुशार, विकासाची जाण,  सुशिक्षित, सुज्ञ उमेदवारालाच आपली पसंती देतील व पार्टी  नेतेसुद्धा अशाच उमेदवाराला आपले सर्मथन देतील, एवढे  मात्र खरे!

जुन्यांना नारळ, तर नव्यांना संधीया अगोदर ग्रामपंचायत सत्ताकारणात ज्यांनी पदे भोगली,  असे काही चेहरेसुद्धा या वेळेस नव्या ताकदीने मतदारांच्या  भेटीगाठी घेताना दिसत आहेत. सत्ता भोगूनसुद्धा त्यांची अ पेक्षा मावळली नसली तरी मतदारराजा अशा जुन्या चेहर्‍यांना  मात्र ‘नारळ’ देत नाकारणार असल्याची चर्चा आहे.