शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST

ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले

राजू पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजरा सुलतानपूर गावाच्या सत्ता  केंद्राकडे लागून असतात. तर सुलतानपूरचे सरपंचपद हे  मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्तापित  इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  मागासवर्गीयमधील अनेक चेहरे बाशिंग बांधून आपली  योग्यता पटवून सांगताना दिसत आहे. यावेळेस सुलतानपूरची  वार्ड संख्या सहा झाली असून, सदस्य संख्या १७ झाली  आहे. त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष असणार आहेत. त्यामुळे  अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद दाखवून महिलांसह  निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज  भरण्यासाठी १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने  अनेकांनी मतदार याद्या आणून मतदारांच्या भेटीसाठी सुरू  केल्या आहेत; मात्र पूर्वीच्या वार्डाची तोडफोड होऊन येथे  वार्ड रचना तयार केली गेली असल्याने या वेळेसच्या  निवडणुकीत मागील अंदाज निकामी ठरणार आहेत. त्यामुळे  विजयाचे गणित अवघड असल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी युवक वर्ग मोठय़ा ताकदीने ग्रामपंचायत सत्ताकारणा त सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जाते. तर  गावातील ज्येष्ठ पुढारी पार्टीचालकसुद्धा नव्या  परंतु  प्रामाणिक व होतकरू चेहर्‍याचा शोध घेत आहेत. सरपंच  पद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने जो-तो आपल्या  गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी तयारी करीत आहे. म तदार मात्र दिवसेंदिवस चांगलाच हुशार, विकासाची जाण,  सुशिक्षित, सुज्ञ उमेदवारालाच आपली पसंती देतील व पार्टी  नेतेसुद्धा अशाच उमेदवाराला आपले सर्मथन देतील, एवढे  मात्र खरे!

जुन्यांना नारळ, तर नव्यांना संधीया अगोदर ग्रामपंचायत सत्ताकारणात ज्यांनी पदे भोगली,  असे काही चेहरेसुद्धा या वेळेस नव्या ताकदीने मतदारांच्या  भेटीगाठी घेताना दिसत आहेत. सत्ता भोगूनसुद्धा त्यांची अ पेक्षा मावळली नसली तरी मतदारराजा अशा जुन्या चेहर्‍यांना  मात्र ‘नारळ’ देत नाकारणार असल्याची चर्चा आहे.