शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अनेक इच्छुकांना लागले सरपंच पदाचे डोहाळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:08 IST

ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देअटीतटीची लढत होणार खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले

राजू पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर: ग्रामीण भागातील मुदत संपणार्‍या ग्रामपंचाय तींचा कार्यकाळ संपत असल्याने नवीन गावकारभारी  निवडीच्या प्रक्रियेने खेड्यापाड्यातील राजकारण तापू लागले  आहे. अशातच प्रथमत: सरपंच निवड ही थेट जनतेतून  निवडल्या जाणार असल्याने सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे  लागल्याचे चित्र आहे.राजकीयदृष्ट्या सर्वांच्या नजरा सुलतानपूर गावाच्या सत्ता  केंद्राकडे लागून असतात. तर सुलतानपूरचे सरपंचपद हे  मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने अनेक प्रस्तापित  इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे  मागासवर्गीयमधील अनेक चेहरे बाशिंग बांधून आपली  योग्यता पटवून सांगताना दिसत आहे. यावेळेस सुलतानपूरची  वार्ड संख्या सहा झाली असून, सदस्य संख्या १७ झाली  आहे. त्यामध्ये ९ महिला तर ८ पुरुष असणार आहेत. त्यामुळे  अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद दाखवून महिलांसह  निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अर्ज  भरण्यासाठी १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने  अनेकांनी मतदार याद्या आणून मतदारांच्या भेटीसाठी सुरू  केल्या आहेत; मात्र पूर्वीच्या वार्डाची तोडफोड होऊन येथे  वार्ड रचना तयार केली गेली असल्याने या वेळेसच्या  निवडणुकीत मागील अंदाज निकामी ठरणार आहेत. त्यामुळे  विजयाचे गणित अवघड असल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी युवक वर्ग मोठय़ा ताकदीने ग्रामपंचायत सत्ताकारणा त सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जाते. तर  गावातील ज्येष्ठ पुढारी पार्टीचालकसुद्धा नव्या  परंतु  प्रामाणिक व होतकरू चेहर्‍याचा शोध घेत आहेत. सरपंच  पद हे जनतेतून निवडल्या जाणार असल्याने जो-तो आपल्या  गटाचा सरपंच कसा होईल, यासाठी तयारी करीत आहे. म तदार मात्र दिवसेंदिवस चांगलाच हुशार, विकासाची जाण,  सुशिक्षित, सुज्ञ उमेदवारालाच आपली पसंती देतील व पार्टी  नेतेसुद्धा अशाच उमेदवाराला आपले सर्मथन देतील, एवढे  मात्र खरे!

जुन्यांना नारळ, तर नव्यांना संधीया अगोदर ग्रामपंचायत सत्ताकारणात ज्यांनी पदे भोगली,  असे काही चेहरेसुद्धा या वेळेस नव्या ताकदीने मतदारांच्या  भेटीगाठी घेताना दिसत आहेत. सत्ता भोगूनसुद्धा त्यांची अ पेक्षा मावळली नसली तरी मतदारराजा अशा जुन्या चेहर्‍यांना  मात्र ‘नारळ’ देत नाकारणार असल्याची चर्चा आहे.