शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

कृषी स्वावलंबन योजनेच्या सिंचन योजनेतून अनेक गावे वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

गजानन तिडके देऊळगाव राजा : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सिंचन योजनेसाठी तालुक्यातील ६५ पैकी ५४ गावे वगळण्यात आल्याने ...

गजानन तिडके

देऊळगाव राजा : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सिंचन योजनेसाठी तालुक्यातील ६५ पैकी ५४ गावे वगळण्यात आल्याने शेकडो मागासवर्गीय शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत़; त्यामुळे, पात्र शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे़ पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन वगळलेल्या गावांचा पुन्हा समावेश करण्याची मागणी हाेत आहे़

महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कृषी स्वावलंबन योजना २०२०-२१ या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत तालुकापातळीवर आदेश प्राप्त झाले आहेत़ यापूर्वी ही याेजना अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विशेष घटक योजना सन १९८२-८३ पासून सन २०१६- १७ पर्यंत राबविण्यात येत होती़ कृषी विभागाच्या २४-२-२०१६च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली़ या समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार योजनेचे नाव बदलून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे नामकरण करण्यात आले़ २०२०-२१ साठी तालुका पातळीवर योजना राबविण्यासाठी आदेश प्राप्त झाले़

असा मिळताे याेजनेत लाभ

शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या योजनेपैकी नवीन विहीर दोन लक्ष ५० हजार मर्यादा जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार, इन वेल बोअरिंग वीस हजार, पंप संच एकूण २० हजार आणि वीजजोडणी आकार १० हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लक्ष रुपये व सूक्ष्म सिंचन संच, त्यामध्ये ठिबक सिंचन ५० हजार आणि तुषार सिंचन २५ हजार, आदी याेजना १०० टक्के अनुदानावर देण्यात येत आहे़; परंतु यामधील सिंचनाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या नवीन विहिरीसाठी तालुक्यातील ५४ गावे वगळण्यात आली आहे़

याेजनेतून ही गावे वगळली

या याेजनेतून भिव गाव चिंचखेड, देऊळगाव मही, धोत्रा, दिग्रस बुद्रुक, डो ढ्., गारखेड, मंडपगाव, नागनगाव, पिंपरी आंधळे, सरंबा, सुलतानपूर, सुरा, नारायण खेड, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, अंभोरा, असोला जहांगीर, बामखेड, बोराखेडी बावरा, चिंचोली बुरकुल, दगडवाडी, देऊळगाव राजा ग्रामीण, दिग्रस खुर्द, डोईफोडे वाडी, गारगुंडी, गिरोली खुर्द, गिरोली बुद्रुक, गोळेगाव, गोंदन खेड, जांभोरा, जवळखेड, जुमडा, खल्याळ गव्हाण, किणी पवार, कुंभारी, मेहुना राजा, निमगाव गुरू, पळसखेड मलक, देव पळसखेड झाल्टा, पांगरी माळी, पिंपळगाव बुद्रुक, पिंपळगाव, चिलम का पिंपळनेर, रोहना, सावखेड भोई, सावंगी टेकाळे, सिंगाव जहागीर टाकरखेड वायाळ, तुळजापूर, उंबरखेड, आदी गावे वगळण्यात आली आहेत़

भूजल सर्वेक्षण नियमानुसार सदर गावे अंशतः शोषित,(सेमी क्रिटिकल) झोनमध्ये येत असल्यामुळे शासन निर्णयानुसार वरील गावे वगळण्यात आली आहेत. यासाठी कृषी विभागामार्फत पत्रव्यवहार करून वंचित गावे सदर योजनेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे़

बी. आर. लवंगे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, देऊळगाव राजा