शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

अनेक दिव्यांग कर्मचारी महत्त्वाच्या ‘टेबल’वर!

By admin | Updated: May 17, 2017 01:20 IST

जिल्हा परिषद सभापती, मोठ्या अधिकाऱ्यांचे ‘पीए’ही दिव्यांग

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शिक्षण क्षेत्रासोबतच जिल्हा परिषदेतील अन्य विभागातही मोठ्या प्रमाणात दिव्यांग कर्मचारी असून, अनेक महत्त्वाच्या टेबलवर त्यांची वर्णी लागली आहे. जिल्हा परिषदेचे मोठे अधिकारी व सभापतीचे काही ‘पीए’ही दिव्यांग असल्याची माहिती आहे. शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता अनेक सुदृढ कर्मचारी दिव्यांग झाले. यापैकी काहींना दृष्टिदोष, काही कर्णबधिर तर काही अस्थिव्यंग झाले. जिल्हा परिषदेत हे दिव्यांग असलेले कर्मचारी एकाच ठिकाणी दहा ते पंधरा वर्षांपासून नोकरी करीत आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्याच्या नियमांचा फायदा या ठिकाणी अनेक दिव्यांग कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे अन्य कर्मचारी मात्र त्रस्त झाले असून, त्यांच्यावर अन्याय होत आहे. जिल्हा परिषदेत विविध विभागात काही महत्त्वाचे पद असते, त्या पदावर असताना अनेकांशी संबंध येतो, तसेच आर्थिक देवाण-घेवाणही होते. अशाच अनेक महत्त्वाच्या टेबलवर दिव्यांग कर्मचारी आहेत. कर्णबधिर व दृष्टिदोष असलेले कर्मचारी महत्त्वाच्या टेबलवर कस, असा प्रश्न उपस्थित होतो. काही जिल्हा परिषदेचे सभापती व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पीएही दिव्यांग असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. शिक्षक संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली जिल्ह्यातील काही कर्मचारी बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन नोकरीत विविध लाभ लाटत असल्याचा प्रकार शिक्षक संघटनांच्या लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करीत निवेदने देण्यात आली; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवेदनांना केराची टोपली दाखवित कोणतीही कारवाई केली नाही. जिल्ह्यात अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे. याची माहिती अन्य कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यावतीने अनेकदा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. शिक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नसल्यामुळे शिक्षक संघटनांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली; मात्र त्यानंतरही अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही, त्यामुळे संघटनाही हतबल झाल्या आहेत. खऱ्या दिव्यांगांची हेळसांड थांबविण्याची गरजएसटीने प्रवास करीत असताना प्रमाणपत्रासाठी खऱ्या दिव्यांगांची हेळसांड होते. याबाबत चौकशी करून एसटी महामंडळाने खऱ्या दिव्यांगांसाठी सवलतीचे कार्ड त्वरित सुरू करावे, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन लक्ष्मण उबरहंडे यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोग्यसेवा संचालनालय, मुंबई यांच्या २७ जून २०१६ च्या पत्रानुसार अपंग विभागांतर्गत कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या व्यक्तींना नवीन दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे रद्द करण्यात येऊ नये, असा आदेश आहे. तरी अशा दिव्यांग प्रमाणपत्रधारकांना कोणत्याही योजनेतून डावलून शासनाच्या नियमांचा अपमान करू नये तसेच खरोखर दिव्यांग असलेल्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी अपंग एसटी पास सवलत ही दिव्यांगांना मिळत नाही. तरी दिव्यांग एसटी पास सवलत कार्ड हे समाज कार्यालय, जि.प. बुलडाणा यांचे अंतर्गत पूर्ववत सुरू करून दिव्यांगांची हेळसांड थांबवावी, अशीही मागणी गजानन उबरहंडे यांनी निवेदनात केली आहे.