शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

अनेक ‘एटीएम’चे शटर डाउन!

By admin | Updated: April 18, 2017 01:05 IST

खामगाव- बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खामगाव : गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून रोकडच मिळालेली नाही. त्यामुळे बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यातून बँका सावरत असतानाच आरबीआयकडून रोख रक्कम मिळणे अनियमित झाले आहे. त्यामुळे बँकांना दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मागील चार दिवसांपासून आरबीआयकडून रोकड मिळाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने दिली. पैसे काढायला आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडे पैसा नाही. त्यामुळे जेवढे पैसे जमा झाले, तेवढेच वाटप केले जात आहेत. परिणामी खात्यात पैसे जमा असूनही ग्राहकांना कमी पैसे दिले जात आहेत. तसेच एटीएममध्ये रक्कम टाकणे अनेक बँकांनी बंद केले असून, एटीएम केंद्रांचे शटर लावून कुलूप ठोकण्यात आले आहे. केवळ आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा निवडक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकली जात आहे; परंतु तेथेही गर्दी होत असल्याने तास-दोन तासात पैसे संपून जातात. पैशांची निकड असलेले अनेक ग्राहक संध्याकाळी या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकंदरित तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.