लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झालेला व शहरातील अत्यंत गजबजलेल्या डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला तोडण्याचा व पुतळय़ाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न अज्ञात समाजकंटकाकडून १0 ऑगस्टच्या रात्री करण्यात आला आहे. हा प्रकार सकाळी ११.३0 च्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पुतळा परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता; मात्र नगरपालिका प्रशासनाने तातडीने वाकविलेला भाला दुरुस्त करून तसेच पुतळय़ाला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या अश्वारूढ पुतळय़ाच्या हातातील भाला १0 ऑगस्टच्या रात्री अज्ञात समाजकंटकाने तोडण्याचा प्रयत्न केला, तसेच पुतळय़ाच्या चेहरादेखील विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याची बाब ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३0 च्या सुमारास बाळू सुरडकर, o्रीकांत सुरडकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर शहरभरात ही वार्ता वार्यासारखी पसरली. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा संख्येने नागरिक जमा झाले व परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या ठिकाणी उपस्थित डॉ. प्रतापसिंग राजपूत, सुभाष राजपूत, ठाणेदार महेंद्र देशमुख, मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, कुणाल बोंद्रे, शे.अनिस शे.बुढण, जि.प. सदस्य शरद हाडे, न.प. सभापती गोविंद देव्हडे, सुधीर चेके, समाधान गाडेकर, उध्दव थुट्टे, संजय सुराणा यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले, तर पालिका प्रशासनाने तातडीने वाकलेल्या भाल्याची दुरुस्ती करण्यात येऊन पुतळय़ास दुग्धाभिषेक केल्यानंतर उपस्थितांनी हारार्पण करून अभिवादन केले. दरम्यान, राजपूत समाजाच्यावतीने पुतळय़ाची विटंबना करणार्या अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल करून त्यास तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येऊन या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी चिखली बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला, तर महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाची झालेली विटंबना ही अत्यंत संतापजनक बाब आहे. अशा स्थितीतही समाजबांधवांनी दर्शविलेला संयम कौतुकास्पद असला, तरी या प्रकरणातील दोषींना १३ ऑगस्टपर्यंत अटक न झाल्यास १४ ऑगस्ट रोजी चिखली बंद पुकारण्यात येईल, तसेच पुतळा परिसराच्या अवघ्या १00 मीटर आत दोन्ही रस्त्यांवर दारूचे दुकान असल्याने एखाद्या मद्यपीकडून हे कृत्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुतळा परिसरातील दोन्ही रस्त्यांवरील दारूची दुकाने तातडीने हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी भाजपाचे डॉ.प्रतापसिंग राजपूत यांनी केली. या घटनेचा भाजपा, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी संघटना, तालुका पत्रकार संघ यांच्यासह सर्व संघटनांनी तीव्र निषेध नोंदविला असून, आरोपीस तातडीने अटक करण्याची मागणी करीत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
पुतळ्याला विशेष महत्त्वशहराच्या सौंदर्यीकरणात महत्त्वाची भर घालणार्या हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळय़ाचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते १७ जुलै २00८ रोजी झाले आहे. हा संपूर्ण पुतळा ‘ब्रान्झ’ धातूमध्ये बनविलेला असून, या पुतळय़ाचे वजन १६ क्विंटल तर महाराणा प्रताप यांच्या हातातील भाला १0 फूट लांबीचा आहे, त्यामुळे या पुतळय़ाला विशेष महत्त्व आहे.