शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

चांदी उजळून देण्याचे आमिष;दोघांना पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:26 IST

नागरिकांची सतर्कता : ग्रामीण भागात फसवणुकींच्या घटना वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तांब्या-पितळीची भांडी उजळून देण्याचे सांगत एका महिलेच्या चांदीच्या पाटल्या घेऊन पसार होणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडले. ही घटना बुधवारी दुपारी खिरोडा येथे घडली. खिरोडा येथील ताईबाई राजाराम गाढे यांच्या घरी दोन भामट्यांनी तांब्या -पितळीची भांडी चमकवून देण्याचे सांगत प्रवेश केला. यावेळी हातातील चांदीच्या पाटल्यादेखील उजळून देण्याचे सांगितले. या पाटल्या घेऊन संबंधितांनी पळ काढला असता, महिलेने आरडाओरड केली. त्यावेळी ग्रामस्थांनी दीपक सिकंदर शर्मा, मनिष नंदलाल यादव या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी गावातील गोपाल चांदणे, पोलीस पाटील योगेश दाणे, धम्मपाल गाढे, अमोल दाणे, पंंकज ठाकूर या युवकांची समयसुचकता कामात आली. गावातील या युवकांनी समयसुचकता दाखविली नसती, तर महिलेच्या चांदीच्या पाटल्या परत मिळाल्या नसत्या. त्यामुळे युवकांच्या समयसुचकतेचे परिसरात कौतुक होत आहे.