शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

बाजरीच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार ...

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधनखेड येथील सखाराम शामराव गीते यांनी केली आहे. यामुळे कृषी विभागाने तक्रारीची दखल घेत कृषी उपविभागीय अधिकारी वसंत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पथक निर्माण केले. या ठिकाणी कृषी विभागाचे शास्त्रज्ञ कानवडे, देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर, प्रांजली कोरेवर, घनश्याम डोईफोडे, कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रबी हंगामात काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बीजोत्पादन क्षेत्रातील हरभरा, गहू, कांदा आदी पिकाला फटका बसला. त्यात आता बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. परिसरात बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही बाजरी बीज भरले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळते. सरकारने वेळीच लक्ष घालून बोगस बियाणांच्या कंपन्यांना लगाम घातला पाहिजे.

शेतकरी संकटात

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. बहुतांश शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे.