शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाजरीच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार ...

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधनखेड येथील सखाराम शामराव गीते यांनी केली आहे. यामुळे कृषी विभागाने तक्रारीची दखल घेत कृषी उपविभागीय अधिकारी वसंत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पथक निर्माण केले. या ठिकाणी कृषी विभागाचे शास्त्रज्ञ कानवडे, देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर, प्रांजली कोरेवर, घनश्याम डोईफोडे, कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रबी हंगामात काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बीजोत्पादन क्षेत्रातील हरभरा, गहू, कांदा आदी पिकाला फटका बसला. त्यात आता बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. परिसरात बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही बाजरी बीज भरले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळते. सरकारने वेळीच लक्ष घालून बोगस बियाणांच्या कंपन्यांना लगाम घातला पाहिजे.

शेतकरी संकटात

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. बहुतांश शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे.