शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

बाजरीच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार ...

यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ज्वारी मोठ्या प्रमाणावर पेरली. कंपनीचे पेरलेले बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशी तक्रार देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधनखेड येथील सखाराम शामराव गीते यांनी केली आहे. यामुळे कृषी विभागाने तक्रारीची दखल घेत कृषी उपविभागीय अधिकारी वसंत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पथक निर्माण केले. या ठिकाणी कृषी विभागाचे शास्त्रज्ञ कानवडे, देऊळगाव राजा तालुक्यातील कृषी अधिकारी रोहिदास मासाळकर, प्रांजली कोरेवर, घनश्याम डोईफोडे, कृषी विभागाचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रबी हंगामात काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बीजोत्पादन क्षेत्रातील हरभरा, गहू, कांदा आदी पिकाला फटका बसला. त्यात आता बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. परिसरात बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. पेरा करूनही बाजरी बीज भरले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळते. सरकारने वेळीच लक्ष घालून बोगस बियाणांच्या कंपन्यांना लगाम घातला पाहिजे.

शेतकरी संकटात

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेती उद्योग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. बहुतांश शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागत आहे.