बुलडाणा : उन्हाळ्याच्या सुट्या आणि त्यात लग्नसराईमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीवर विशेष ताण दिसुन येतो. अश्यातच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याचे मालक प्रवाशांची अक्षरश: लुट करीत आहेत. उन्हाळयासह इतर सुट्टय़ांचा काळात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या त्यांच्या प्रवाशी भाड्यामध्ये दुप्पट, तिप्पटीने दरवाढ करून प्रवाश्यांची लुट करताना दिसुन येतात. अशावेळी नाईलाजास्तव प्रवाशी मागितली तेवढी रक्कम मोजतात. प्रवाशांच्या या लुटीमागे आरटीओ कार्यालयाचे दूर्लक्षही तितिकेच कारणीभूत असल्याचे लक्षात येते. महाराष्ट्रात टप्पा वाहतूक करण्याचे अधिकार फक्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाच आहे. परंतु असे असताना खासगी ट्रॅव्हल्स वाह तुकीचे सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून राज्यभरात ट्रॅव्हल्स टप्पा वाहतुक करीत धावतांना दिसतात. बुलडाणा जिल्ह्यातुन सर्वाधीक वाहतूक पुणे येथे होते. पुण्यासाठी एस.टी महामंडळाकडून पुरेशा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन असते पण बर्याच वेळा प्रवाशांच्या सर्वच सुविधा एसटी महामंडळ पुर्ण करू शकत नसल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी कुठलेही दरपत्रक ठरलेले नाहीत. त्यामुळे मनमानेल त्या प्रमाणे तिकीटाचे दर ठरतात. तिकीट विकण्यासाठी पुणे मार्गावरील महत्वाच्या गांवान कमीशनवर आधारीत कोटा देण्यात आला आहे त्यामुळे आपल्या कमीशनची रक्कम टाकून तिकीटाची किंमत वाढविण्याचाच प्रकार केला जातो त्याचाही फटका प्रवाशांना बसतोच.
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लुट
By admin | Updated: May 26, 2014 00:21 IST