शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

तंटामुक्तीच्या कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:39 IST

जिल्हा कार्यालय दोन वर्षांपासून बंदच : पोलीस विभागाकडूनच अभियानाला खो !

फहीम देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : लोकसहभागाची चळवळ असलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम २००७ मध्ये सुरू झाली. या अभियानाची दखल इतर राज्यांमध्येही घेतली गेली. बुलडाणा जिल्हा हा या अभियानात अग्रेसर राहिला. अनेक पुरस्कार या जिल्ह्याला मिळाले. मात्र सध्या हे अभियान पूर्णपणे गुंडाळल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून बुलडाणा येथून नियंत्रण केल्या जाणाऱ्या कार्यालयाला चक्क कुलूप लावण्यात आल्याने गावागावात तंटामुक्त अभियानाचे वांदे झाले असून तंटे वाढलेले आहेत. राज्यात या योजनेवर अंमलबजावणी सुरु असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र या अभियानाला थांबा देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात दोन वर्षांपूर्वीपर्यंत बुलडाणा जिल्हा अग्रेसर होता. २०१४ पर्यंत जिल्ह्यातील ८६७ पैकी ८५९ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याने जिल्हाभरातील गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने कमी होण्यास या अभियानाचे सहकार्य लाभले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक शामराव दिघावकर आणि लखमी गौतम यांनी महात्मा गांधी तुटामुक्त गाव अभियानाला जिह्यात यशस्वी करून दाखविले होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी यात सातत्य कायम न ठेवता मागील २ वर्षांपासून ज्या कार्यालयातून हे अभियान नियंत्रित केल्या जायचे तेच कार्यालय बंद करून टाकले. यामुळे या अभियानाचे बुलडाणा जिल्ह्यातील गावागावाते वांदे झाले आहे. त्याचे परिणाम वाढत्या गुन्हेगारींवर झालेले असून जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. काही गावांमध्ये तर तंटामुक्त समित्यांमध्येच तंटा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. गावातील तंटे मिटविण्याऐवजी समिती स्वत:च वादात सापडल्याची उदाहरणे अनेक गावांमध्ये दिसून येत आहेत. समित्यांबरोबरच पोलीस व महसूल प्रशासनही या अभियानाबाबत सध्या गंभीर नसल्याची परिस्थिती आहे. महसूल व पोलिसच गंभीर नसल्याने अभियानाचे भवितव्य धोक्यात आले आहे. अभियानाचे निकष शांततेतून समृध्दीकडे असे ब्रीद वाक्य असलेल्या या योजनेत सामंजस्याने गावपातळीवरील तंटे मिटविण्याची पध्दत आहे़ अभियानाच्या माध्यमातून दिवाणी, फौजदारी, महसूली आणि इतर तंटे सामोपचाराने मिटवण्यात येतात़ तसेच अभियानात गाव पात्र ठरण्यासाठी या अभियानाला काही नियम व अटी घालून दिल्या आहेत़ त्यानुसार या अभियानाला २०० गुण देण्यात आले असून त्यापैकी १५0 गुण मिळवलेले गावच या योजनेस पात्र ठरणार आहे़ पात्र ठरलेल्या गावाला २००१ च्या जनगणनेनुसार दर हजारी लोकसंख्येला १ लाख रुपये बक्षीस ठरविण्यात आले आहे़ याशिवाय गावाने १९० गुण प्राप्त केले तर त्या गावाला विशेष शांतता पुरस्कार देवून सन्मानित केले जाते आणि एकूण बक्षिसाच्या सुमारे २५ टक्के ज्यादा रक्कम दिली जाते़ याशिवाय या अभियानाला उत्कृष्ठ प्रसिध्दी दिल्यामुळे पत्रकारांना देखील राज्यस्तर, विभागस्तर आणि जिल्हास्तर अशा विविध स्तरावर बक्षीस देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे़ सध्या मात्र अभियान पूर्णपणे बंद पडले आहे. पोलीस अधीक्षक मीना यांनी लक्ष देण्याची गरज!मागील दोन वर्षापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक बाविस्कर रुजू होताच अधिकांश तंटामुक्त गाव मोहिमेचे कार्यालय बंद पडले. यातील नियुक्त कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यामुळे कुठल्याही पोलीस स्टेशनला ही समिती कार्यरत नाही.२ वर्षापासून बंद पडलेले तंटामुक्तीचे जिल्हा कार्यालय पोलीस अधीक्षक मीना यांनी योजनेचे फलित आणि गुन्हेगारांचा वाढता आलेख पाहता तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांकडून होत आहे.