शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत गाजणार स्थानिक मुद्दे

By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST

खामगावातील स्थानिक मुद्दे विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असल्याचे दिसुन येत आहे.

अनिल गवई / खामगावशहरात गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचा ज्वर तीव्र होत आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नाही; मात्र शहरात कोण उमेदवार राहील, अमका उमेदवार रिंगणात असल्यास कशी लढत रंगणार, आदी प्रश्नांची चर्चा सध्या गल्लीबोळात रंगू लागली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह त्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारासंदर्भातील कुजबुज आता दैनंदिन विषय झाला आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणामुळे राष्ट्रीय राजकारणासोबतच वाढती महागाई आणि इतर समस्यांचा मुद्दा आता गौण झाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघासह खामगाव शहरात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेला लीड काँग्रेसच्या उमेदवारासाठी चिंता वाढविणारा असाच आहे.खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सानंदा यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्या दृष्टिकोनातून आ. सानंदा यांनी आपली इमेज बिल्डिंग करण्याचे प्रयत्न ग्रामीण भागासह शहरात चालविले आहेत. शहर विकास आघाडीच्या तावडीत असलेल्या नगरपालिकेवर आघाडीचा झेंडा फडविण्यात ते यशस्वी झाले आहेत. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत बाजी मारत विधानसभेपूर्वीची सेमिफायनल त्यांनी जिकंली आहे. या शिवाय शहरातील प्रत्येक समाजाला जोडण्याचे त्यांचे मनसुबे असून, शहरातील प्रत्येक वस्तीमध्ये त्यांनी विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी ते झपाट्याने पुढे सरसावले आहेत. त्याचवेळी शहरातील पॉवरफुल नेते आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनीही ह्यअबकी बार..आकाश फुंडकरह्ण असा नारा देत, त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर यांना रिंगणात उतरविले आहे. भाऊसाहेबांची राजकीय कारकीर्द आणि मोदी लाटेवर स्वार होत आकाश फुंडकर यांनीही दंड थोपटले आहे. भाऊसाहेबांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून आकाश फुंडकर यांचे पारडे जड असल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित आहे. मोदी लाटेच्या प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांना खामगाव विधानसभा मतदारसंघात २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. खामगाव शहरात ही आघाडी ९ हजार मतांच्या घरात आहे. त्यामुळे भाजपचे पारडे कसे जड आहे, या निवडणुकीत एवढा मोठा लीड कापणे काँग्रेसला अशक्य होईल, तर दुसरीकडे आमदार सानंदा यांच्या विकास कामाच्या पुढे भाजप फेल पडेल, असा प्रतिदावाही मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून आ. सानंदा विजयी होत आहेत. त्यांनी दिलेली अनेक आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. कोट्यवधी रुपयांची विकास कामे त्यांनी केली आहेत; मात्र मतदारसंघात विकासात्मक कामे हवी त्या प्रमाणात झाली नसल्याचाही सूर शहरातील काही प्रभागातील मतदारांमध्ये आहे. विकास कामांपेक्षा आ. सानंदांचा गाजावाजा मोठा असल्याचीही चर्चा शहरात आहे. दुसरीकडे या दोघांच्या भांडणात भारिपचे अशोक सोनोने यांनीसुद्धा मतदारसंघात आपली प्रतिमा उजळविण्याचे काम सुरू केले आहे. जशा निवडणुका जवळ येतील तशी परिस्थिती बदलणार आहे. कारण आजची स्थिती उद्या तशीच राहात नाही. कदाचित ही परिवर्तनाचीही नांदी असू शकते. त्यादृष्टीने प्रत्येक जण कामाला लागला आहे.