शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्थानीक कलावंतांना डावलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:26 IST

बुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयातर्फे आर.बी. नावाच्या कंपनीतर्फे शहरी भागात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सहभाग सुरु झाला आहे.  अशा उपक्रमासाठी आतापर्यंत विविध जनजागृतीसाठी परिश्रम घेणार्‍या स्थानिक कलावंतांना डावलण्यात आले असून जिल्ह्यातील मानधन घेणार्‍या ५0 कलासंच तसेच त्यातील ८00 कलावंतांमधून जनजागृतीसाठी कोणीच कलावंत शासनाच्या लेखी पात्र नसावा, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देस्वच्छता अभियान जनजागृतीसाठी व्यावसायिक कंपनीचा आधार  

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयातर्फे आर.बी. नावाच्या कंपनीतर्फे शहरी भागात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सहभाग सुरु झाला आहे.  अशा उपक्रमासाठी आतापर्यंत विविध जनजागृतीसाठी परिश्रम घेणार्‍या स्थानिक कलावंतांना डावलण्यात आले असून जिल्ह्यातील मानधन घेणार्‍या ५0 कलासंच तसेच त्यातील ८00 कलावंतांमधून जनजागृतीसाठी कोणीच कलावंत शासनाच्या लेखी पात्र नसावा, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लोककला जिवंत रहावी म्हणून कलेवर जगणार्‍या लोक कलावंतांना शासन मानधन देण्याचे काम करत आहे. त्यातच त्यांचेमार्फत शाहिरी इतर कार्यक्रमांद्वारे शासनाच्या योजनेची माहिती पुरविण्याचे काम केल्या जात आहे. अशा प्रकारे जनजागृती करणार्‍या विविध कार्यक्रमात सहभाग घेणार्‍या  कलासंचाची संख्या जिल्ह्यात ५0 असून त्यातील लोककलांवतांनी संख्या ८00 पेक्षा जास्त आहे. मात्र  बेटी बचाओ, स्वच्छता अभियाना, दारुबंदी या सह विविध कार्यक्रम राबविणार्‍या लोककलावंतांना स्वच्छता अभियानातील आर. बी. कंपनीचा सहभाग शासनाने सुरू केल्यामुळे धक्का बसला आहे. बरेच वर्षापासून शासनाची नियमित सेवा करणारे लोककलावंत आता निराश झाले आहे. २५ सप्टेंबर २0१७ पयर्ंत हागणदारीमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्याकरता संपुर्ण महानगरपालिका नजीकच्या काळात हागणदारी मुक्त होणे आवश्यक आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनेअंतर्गत नागरी महाराष्ट्र ऑक्टोबर २0१८ पयर्ंत स्वच्छ करण्याचेही उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्याकरीता नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर.बी. या कंपनीला जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती, वर्तणुकीतील बदल करण्याकरीता  सहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र या उपक्रमात स्थानिक लोककलावंतांना डावलल्यामुळे रोष व्यक्त होत आहे. याबाबत शाहीर डी.आर.इंगळे यांच्या नेतृत्वात लोककलावंतांनी जिल्ह्याधिकार्‍यांना निवेदन देवून स्थानिक कलावंतांना संधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

दररोज १0 पथनाट्ये कसे सादर होणार?या उपक्रमाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या एका पत्रानुसार ही कंपनी २२ ऑगस्ट रोजी मलकापूर मोताळा, २३ ऑगस्ट रोजी नांदुरा खामगाव, २५ ऑगस्ट रोजी संग्रामपूर जळगाव जामोद, २६ ऑगस्ट रोजी मेहकर लोणार, २८ ऑगस्ट रोजी चिखली येथे दहा पथनाट्य सादर करणार आहेत. तर शेगाव येथे २४ ऑगस्ट रोजी सात पथनाटयाचे आयोजन करण्यात आले आहे. तर एका दिवशी एवढे पथनाट्य सादर होऊ शकत नसल्याचे लोककलांवतांचे म्हणणे आहे. 

सांस्कृतीक व जनजागृतीच्या क्षेत्रात ठेकेदारी पध्दत चुकीची असून जे कलावंत प्रत्यक्ष जनजागृती करतात. अशा कलावंतांना संधी द्यावी, अन्यथा जिल्ह्यातील कलावंत न्याय मिळण्यासाठी आंदोलन करतील.- शाहीर डी.आर. इंगळे, लोककवी वामन कर्डक प्रतिष्ठाण, बुलडाणा