शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

बचतगटांचा कर्जपुरवठा ठप्पच!

By admin | Updated: June 24, 2017 05:38 IST

सभासद महिलांची होत आहे अडचण.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बचतगटांचा कर्जपुरवठा विविध फायनान्स कंपन्यांनी थांबवलेला आहे. त्यामुळे विविध बचत गटांच्या सभासद महिलांची अडचण होत असून, कर्जपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या व काही बँकांकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता; परंतु सुमारे १0 महिन्यांपूर्वी अमरावती जिल्हय़ात काही बचतगटाच्या महिलांनी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारी करून कर्जाची परतफेड थांबवली. अकोला, बुलडाणा जिल्हय़ातही काही बचतगटाच्या सभासदांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले. बचतगटांचे कर्ज माफ झाल्याची अफवासुद्धा पसरली होती. त्यामुळे काही फायनान्स कंपन्यांचे नुकसान होऊ लागल्याने त्यांनी नव्याने कर्जवाटप करणे बंद केलेले आहे. खामगाव शहर व परिसरात ग्रामशक्ती (फुलर्टन) ग्रामीण कुटा, एल अँन्ड टी, दिशा फायनान्स, निर्मल-उज्ज्वल, एचडीएफसी बँक आदींकडून बचतगटांना कर्जपुरवठा करण्यात येत होता. यातील ग्रामीण कुटा, एचडीएफसी बँक यांचा कर्जपुरवठा सद्यस्थितीत सुरू आहे; मात्र अन्य काही कंपन्यांच्यावतीने अद्याप कर्जपुरवठा पूर्ववत सुरू झालेला नाही. त्यामुळे महिला सभासदांची अडचण होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू होत असतानाच्या काळात या फायनान्स कंपन्यांकडून नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या सभासद महिलांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंंंतचे कर्ज दिले जात असते. ते यावर्षी अनेक बचत गटांना मिळू शकले नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्या काळात त्यांची अडचण झालेली आहे. वसुली नसल्याने वाटप बंदज्या फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीवर परिणाम झाला त्याच कंपन्यांनी नवीन कर्जवाटप बंद केलेले आहे. तर ज्यांची वसुली व्यवस्थित सुरू आहे, त्या कंपन्यांनी वाटप सुरू ठेवलेले आहे. थकबाकीचे प्रमाण कमी झाल्यास थांबलेले वाटप पूर्ववत सुरू होऊ शकते अशी माहिती एका कंपनीच्या अधिकार्‍याने दिली.ग्रामीण कुटाच्या वतीने बचत गटांचे कर्जवाटप सुरूच आहे. वसुली पूर्ण होत असल्याने वाटप थांबविण्याचा प्रश्नच नाही. मे, जून व जुलै महिन्यात आम्ही दरवर्षी शैक्षणिक कर्जाचे वाटप करतो. ते यावर्षीही देण्यात येत आहे. महिलांनी कर्जाची परतफेड नियमीतपणे केली तर त्यांना कोणतीच अडचण येणार नाही.-रवीकुमार सूर्यवंशीशाखा व्यवस्थापक, ग्रामीण कुटा