बुलडाणा : शहरासह रस्त्यावरील झाडांवर लावण्यात आलेले जाहिरात फलक धोक्याचे ठरू लागले आहेत. हे जाहिरात फलके कोसळल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यापूक्षाही जाहिरात फलकांमुळे झाडांना ईजा होऊन झाडे कमकुवत होऊ लागली आहेत. वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघ त असून त्यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. येथील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे खिळ्यांनी जाहिरातींचे फलक ठोकलेले आहेत. काही ठिकाणी झाडांचे खोड कोरून त्यात देवादिकांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत असून त्याबाबत कुठलीही कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चिखली, बुलडाणा, मलकापूर महामार्गावर मोठय़ा प्रमाणावार रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. या झाडावर विविध औषध कंपन्या, खताच्या कंपन्या व इतर कंपन्याचे फलक खिळ्याने ठोकल्या जातात. या फलकामुळे वृक्षांचे होत असलेले हाल ठिकठिकाणी बघायला मिळतात. वनकायदा एवढा सक्षम असतानाही त्याचे पालन अजिबात होताना दिसत नाही.
जाहिरात फलकांमुळे घटतेय झाडांचे आयुष्य
By admin | Updated: May 26, 2014 00:21 IST