शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी २४३ खासदारांना पाठविले पत्र

By admin | Updated: August 27, 2016 03:01 IST

धाड येथील संरपचाची ग्रामविकासासाठी निधीची मागणी.

धाड (जि. बुलडाणा), दि. २६ : गेल्या अनेक वर्षात गावपातळीवर असणार्‍या मूलभूत सुविधांचा अभाव आणि मुख्य असलेल्या रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या, पथदिवे यासह शिक्षण, आरोग्य या विषयावर ग्रामपंचायतीस दरवर्षी मिळणारा तोकडा निधी, वर्षानुवर्षे गटातटाच्या राजकारणात गावविकासाला बसलेली खीळ, यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यास निघालेल्या धाड येथील सरपंच रिझवान सौदागर यांनी थेट देशातील तब्बल २४३ राज्यसभा खासदारांना पत्र लिहून धाड गावाच्या मूलभूत समस्या कायम निकाली काढण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. प्रत्येकवेळी गावपातळीवर निवडणुका होतात. एक गट सत्तेत येतो आणि पाच वर्षे गटातटाच्या राजकारणात वेळ निघून जातो. त्यामुळे प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या यासारख्या सोयी उपलब्ध दिसत नाही. परिणामी, घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न सामाजिक वातावरण हे बिघडलेले राहते. आपल्या कार्यकाळात स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची दज्रेदार व्यवस्था या बाबीवर लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत धाडच्यावतीने देशातील एकूण असणार्‍या २४३ राज्यसभा सदस्यांना आपल्या निधीपैकी काही निधी धाडसारख्या गावास देण्याच्या मागणीचे निवेदन पत्र त्यांनी वरील खासदारांना पाठविले आहे. बहुधा राज्यसभेवरील बहुतेक खासदार यांचा निधी पडूनच राहतो. ही बाब सरपंच रिझवान सौदागर यांनी हेरली, याचा उपयोग हा गावाच्या विकास कामासाठी होऊ शकतो. म्हणून त्यांनी इंटरनेटवरुन देशातील राज्यसभा सदस्यांची नावे, पत्ता, मो.नंबर, ई-मेल शोधून त्यांना निवेदन पत्र लिहिले. सोबत गावातील समस्या असणारी बोलकी छायाचित्रे पत्रासह जोडून प्रत्येक खासदारांना पाठविली आहेत. गावविकासाचा हेतू आणि ध्येय पाहता त्यांचा हा उपक्रम राज्यातून अभिनव असाच आहे. सध्या शासनाकडून ग्रा.पं.ला मिळणारा निधी आणि विषय हे रस्ते, पाणी, सांडपाणी हे वगळून असल्याने या समस्या सोडवणे कठीण असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी उपसरपंच दिलीप खांडवे, म.शफी, ऐहसान सेठ, सोहील सौदागर, मंगेश जाधव, प्रभाकर जाधव, शेख इमरान, रमेश सनान्से, लक्ष्मण बावणे, अकील सौदागर उपस्थित होते.