शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

समस्या सोडविण्यासाठी २४३ खासदारांना पाठविले पत्र

By admin | Updated: August 27, 2016 03:01 IST

धाड येथील संरपचाची ग्रामविकासासाठी निधीची मागणी.

धाड (जि. बुलडाणा), दि. २६ : गेल्या अनेक वर्षात गावपातळीवर असणार्‍या मूलभूत सुविधांचा अभाव आणि मुख्य असलेल्या रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या, पथदिवे यासह शिक्षण, आरोग्य या विषयावर ग्रामपंचायतीस दरवर्षी मिळणारा तोकडा निधी, वर्षानुवर्षे गटातटाच्या राजकारणात गावविकासाला बसलेली खीळ, यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यास निघालेल्या धाड येथील सरपंच रिझवान सौदागर यांनी थेट देशातील तब्बल २४३ राज्यसभा खासदारांना पत्र लिहून धाड गावाच्या मूलभूत समस्या कायम निकाली काढण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. प्रत्येकवेळी गावपातळीवर निवडणुका होतात. एक गट सत्तेत येतो आणि पाच वर्षे गटातटाच्या राजकारणात वेळ निघून जातो. त्यामुळे प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या यासारख्या सोयी उपलब्ध दिसत नाही. परिणामी, घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न सामाजिक वातावरण हे बिघडलेले राहते. आपल्या कार्यकाळात स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची दज्रेदार व्यवस्था या बाबीवर लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत धाडच्यावतीने देशातील एकूण असणार्‍या २४३ राज्यसभा सदस्यांना आपल्या निधीपैकी काही निधी धाडसारख्या गावास देण्याच्या मागणीचे निवेदन पत्र त्यांनी वरील खासदारांना पाठविले आहे. बहुधा राज्यसभेवरील बहुतेक खासदार यांचा निधी पडूनच राहतो. ही बाब सरपंच रिझवान सौदागर यांनी हेरली, याचा उपयोग हा गावाच्या विकास कामासाठी होऊ शकतो. म्हणून त्यांनी इंटरनेटवरुन देशातील राज्यसभा सदस्यांची नावे, पत्ता, मो.नंबर, ई-मेल शोधून त्यांना निवेदन पत्र लिहिले. सोबत गावातील समस्या असणारी बोलकी छायाचित्रे पत्रासह जोडून प्रत्येक खासदारांना पाठविली आहेत. गावविकासाचा हेतू आणि ध्येय पाहता त्यांचा हा उपक्रम राज्यातून अभिनव असाच आहे. सध्या शासनाकडून ग्रा.पं.ला मिळणारा निधी आणि विषय हे रस्ते, पाणी, सांडपाणी हे वगळून असल्याने या समस्या सोडवणे कठीण असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी उपसरपंच दिलीप खांडवे, म.शफी, ऐहसान सेठ, सोहील सौदागर, मंगेश जाधव, प्रभाकर जाधव, शेख इमरान, रमेश सनान्से, लक्ष्मण बावणे, अकील सौदागर उपस्थित होते.