शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी २४३ खासदारांना पाठविले पत्र

By admin | Updated: August 27, 2016 03:01 IST

धाड येथील संरपचाची ग्रामविकासासाठी निधीची मागणी.

धाड (जि. बुलडाणा), दि. २६ : गेल्या अनेक वर्षात गावपातळीवर असणार्‍या मूलभूत सुविधांचा अभाव आणि मुख्य असलेल्या रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या, पथदिवे यासह शिक्षण, आरोग्य या विषयावर ग्रामपंचायतीस दरवर्षी मिळणारा तोकडा निधी, वर्षानुवर्षे गटातटाच्या राजकारणात गावविकासाला बसलेली खीळ, यातून गावाचा चेहरा-मोहरा बदलण्यास निघालेल्या धाड येथील सरपंच रिझवान सौदागर यांनी थेट देशातील तब्बल २४३ राज्यसभा खासदारांना पत्र लिहून धाड गावाच्या मूलभूत समस्या कायम निकाली काढण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. प्रत्येकवेळी गावपातळीवर निवडणुका होतात. एक गट सत्तेत येतो आणि पाच वर्षे गटातटाच्या राजकारणात वेळ निघून जातो. त्यामुळे प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या यासारख्या सोयी उपलब्ध दिसत नाही. परिणामी, घाणीचे साम्राज्य, आरोग्याचा प्रश्न सामाजिक वातावरण हे बिघडलेले राहते. आपल्या कार्यकाळात स्वच्छ पिण्याचे पाणी, चांगले रस्ते, सांडपाण्याची दज्रेदार व्यवस्था या बाबीवर लक्ष देऊन त्या सोडवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत धाडच्यावतीने देशातील एकूण असणार्‍या २४३ राज्यसभा सदस्यांना आपल्या निधीपैकी काही निधी धाडसारख्या गावास देण्याच्या मागणीचे निवेदन पत्र त्यांनी वरील खासदारांना पाठविले आहे. बहुधा राज्यसभेवरील बहुतेक खासदार यांचा निधी पडूनच राहतो. ही बाब सरपंच रिझवान सौदागर यांनी हेरली, याचा उपयोग हा गावाच्या विकास कामासाठी होऊ शकतो. म्हणून त्यांनी इंटरनेटवरुन देशातील राज्यसभा सदस्यांची नावे, पत्ता, मो.नंबर, ई-मेल शोधून त्यांना निवेदन पत्र लिहिले. सोबत गावातील समस्या असणारी बोलकी छायाचित्रे पत्रासह जोडून प्रत्येक खासदारांना पाठविली आहेत. गावविकासाचा हेतू आणि ध्येय पाहता त्यांचा हा उपक्रम राज्यातून अभिनव असाच आहे. सध्या शासनाकडून ग्रा.पं.ला मिळणारा निधी आणि विषय हे रस्ते, पाणी, सांडपाणी हे वगळून असल्याने या समस्या सोडवणे कठीण असल्याचे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी उपसरपंच दिलीप खांडवे, म.शफी, ऐहसान सेठ, सोहील सौदागर, मंगेश जाधव, प्रभाकर जाधव, शेख इमरान, रमेश सनान्से, लक्ष्मण बावणे, अकील सौदागर उपस्थित होते.