मोताळा: माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाच्या सोयी व सुविद्या पोहोचत नाहीत. त्यामुळेते शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकन नाहीत. स्पर्धेच्या युगातील हीगरज ओळखून शहरानजीकच्या बोराखेडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिकशाळा ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व शिक्षकांच्या पुढाकाराने शंभर टक्केडिजीटल बनली आहे. त्यामुळे पूर्वी जी मुले शाळेतच जायची नाहीत, तीच मुलेआज दररोज शाळेत जावून टॅबवर शिक्षण घेत आहेत. बोराखेडी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीते आठवी पर्यंतंचे वर्ग आहेत. शाळेत मुख्याध्यापकासह आठ शिक्षक व ३०६विद्यार्थी आहेत. इयत्ता पहिली, दुसरी व आठवी सेमी तथा इयत्ता तिसरी तेसातवीपर्यंत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. शाळेला आयएसओचा दर्जाप्राप्त झाला असून, तालुक्यात मान मिळविणारी बोराखेडीची जिल्हा परिषदशाळा पहिली आहे. राज्यातील ई-लर्निंगच्या उपक्रमात तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या शाळांनी कात टाकली असून, मोताळा तालुका अग्रेसर आहे. हाउपक्रम राबवितांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. थोड््याशाप्रयत्नामुळे शाळांमध्ये परिणामकारक बदल घडून आल्याचे पहावयास मिळत आहे.परिणामी खेडी, टाकळी व बोराखेडीची शाळा टॉपवर असून, ह्या शाळाही कशापद्धतीने दर्जेदार बनविल्या जाऊ शकतात, हे ई-लर्निंगने शिकविले आहे.बोराखेडी शाळेत लोकसहभागामुळे ई-लर्निंंग उपक्रमाच्या माध्यमातून संगणक,एलसीडी, प्रोजेक्टर, ईन्वरर्टर, डिजीटल मोबाइल, टॅब, लॅपटॉप आदी सुविद्याउपलब्ध झाल्याने शिक्षणाविषयीची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झालीअसून, जिज्ञासाही वाढली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गतराज्य शासनाच्या निर्णयानुसार बोराखेडीच्या शाळेने ई-लर्निंगचा कार्यक्रमराबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालक सभा, मेळावे, बैठका घेऊनमुख्याध्यापक चव्हाण व शाळेतील इतर शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीनेमागील तीन वर्षात ही किमया करून दाखविली आहे. परिणामी आज रोजी या शाळेतीलवर्ग १ ते ८ चे वर्ग आता पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानानुसार चालू आहे.ई-लर्निंगसह अन्य आधुनिक सुविद्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अवघड विषयांचीगोडी वाढली आहे. विद्यार्थ्याना डिजीटल मोबाइल, टॅब व लॅपटॉपसह कृतियुक्तशिक्षण दिल्या जात आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येआंतरक्रिया घडविणारे शिक्षण मिळत असल्याचे मुख्याध्यापक अनिल चव्हाणयांनी सांगितले.कॉन्व्हेंटचे वाढते फॅड पाहून या शाळेचा ड्रेस कोड पूर्णपणे बदल केलाआहे. शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट, शूज, ओळखपत्र,शालेयगणवेश व आधारकार्ड शाळेकडून वितरित करण्यात आले आहेत. शिक्षकांकडे वर्ग १ते ८ वी पर्यंतचे मराठी व इंग्रजी माध्यमाचे सॉफ्टवेअर शाळेत उपलब्ध आहे.शाळेतील शिक्षक पूरक मार्गदर्शन म्हणून विद्यार्थ्यांना अँड्रॉइडच्यासॉॅफ्टवेअर द्वारे शिकवितात. त्यामुळे या शाळेत स्मार्ट विद्यार्थी घडतअसून बोराखेडीची शाळा मॉडल स्कूल म्हणून नावारूपास आली आहे. शाळेतीलभौतिक सुविद्या, ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापन व शाळेसहविद्यार्थ्यांमध्ये होत असलेला परिपूर्ण बदल पाहता सीईओ दीपा मुधोळ,शिक्षणाधिकारी देशमुख यांनी जिल्हाभरातील शिक्षकांना बोराखेडी येथीलशाळेला भेट देऊन आपली शाळासुद्धा शंभर टक्के प्रगत करावी अश्या सुचनादिल्या आहेत. परिणामी या सत्रात आतापर्यंत या शाळेला जवळपास ६०० शिक्षक वअधिकाऱ्यांनी भेटी देवून प्रगतीचा आढावा घेतलाआहे. यामध्ये यवतमाळ, पुणे,हिंगोली, जळगाव, नागपूर व एनसीआरटी संस्थेचा समावेश असून, जिल्हातीलसंग्रामपूर, मलकापूर, खामगाव, नांदुरा, बुलडाणा, शेगाव, चिखली पंचायतसमितीमधील ५५० शिक्षकांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
आदीवासी विद्यार्थ्यांना टॅबवर शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 15:32 IST