शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे सामूहिक विवाहाकडे पाठ

By admin | Updated: May 15, 2015 23:18 IST

आयोजन संस्था गेल्या कुठे; वेळ व पैशाच्या बचतीकडे झाले दुर्लक्ष.

बुलडाणा : पारंपरिक विवाह सोहळ्यात वर्‍हाड्यांवर होणारा खर्च पाहता काही वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची प्रथा सुरू झाली होती; मात्न अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच अनुदान थेट वधूवरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे संस्थेसह लग्न इच्छुकांनी आता या सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविल्याचे चित्न दिसत आहे. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. विवाह हा एक पवित्न संस्कार असून, प्रत्येकाने विवाह करावा, अशी समाजधारणा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विवाह करतो. या विवाहासाठी पैसा हा मूलभूत घटक असतो. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीनुसार विवाहाचे सोपस्कार पार पाडण्याचा प्रयत्न करतो. जसजसे समाजात परिवर्तन होत आहे. तसतसा विवाहाच्या स्वरूपात बदल होत चालला आहे. आठ-आठ दिवस चालणारे लग्न आता केवळ एका दिवसावर येवून ठेपले आहे. लग्न एकच वेळ होते. म्हणून पैशाची उधळपट्टी करण्यात कसलीही कसर सोडली जात नाही. हे सर्व श्रीमंतासाठी ठीक असते; परंतु सर्वसामान्यांसह गरीब माणसाचे काय? अशा लोकांसाठी एका मुलीचे लग्न करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. यातूनच सामूहिक विवाहाची परंपरा पुढे आली. लग्नावर होणार खर्च हा कमीत कमी व्हावा, या उद्देशातूनच विविध जातीच्या संघटना आपल्या जातीतील सर्वसामान्यांना व गरीब माणसाच्या मदतीला धावून आल्या आणि त्यातून सामूहिक विवाह सोहळे जन्माला आले. आपल्या जातीतील लोकांचा विवाहावर अतिरिक्त खर्च होऊ नये, पैशाची बचत व्हावी, म्हणून सामूहिक विवाह आयोजक संस्था मागील बर्‍याच वर्षांपासून कार्यान्वित होत्या. सुरुवातीला या संघटनांना मोठा पाठिंबा समाजाने दिला. एका सामूहिक विवाहात ५0 पेक्षाही जास्त वर- वधूंचे विवाह पार पाडले जात होते; मात्र अलिकडे परिस्थिती बदलू लागली आहे. सामूहिक विवाहात मुलामुलींचे विवाह करण्याचा कल कमी होत आहे. यामुळे आगामी काळात सामूहिक विवाहासाठी जोडपे मिळणार की नाही, अशी शंकाही निर्माण होत आहे.