शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे सामूहिक विवाहाकडे पाठ

By admin | Updated: May 15, 2015 23:18 IST

आयोजन संस्था गेल्या कुठे; वेळ व पैशाच्या बचतीकडे झाले दुर्लक्ष.

बुलडाणा : पारंपरिक विवाह सोहळ्यात वर्‍हाड्यांवर होणारा खर्च पाहता काही वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याची प्रथा सुरू झाली होती; मात्न अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे तसेच अनुदान थेट वधूवरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे संस्थेसह लग्न इच्छुकांनी आता या सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविल्याचे चित्न दिसत आहे. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. विवाह हा एक पवित्न संस्कार असून, प्रत्येकाने विवाह करावा, अशी समाजधारणा आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती विवाह करतो. या विवाहासाठी पैसा हा मूलभूत घटक असतो. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीनुसार विवाहाचे सोपस्कार पार पाडण्याचा प्रयत्न करतो. जसजसे समाजात परिवर्तन होत आहे. तसतसा विवाहाच्या स्वरूपात बदल होत चालला आहे. आठ-आठ दिवस चालणारे लग्न आता केवळ एका दिवसावर येवून ठेपले आहे. लग्न एकच वेळ होते. म्हणून पैशाची उधळपट्टी करण्यात कसलीही कसर सोडली जात नाही. हे सर्व श्रीमंतासाठी ठीक असते; परंतु सर्वसामान्यांसह गरीब माणसाचे काय? अशा लोकांसाठी एका मुलीचे लग्न करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. यातूनच सामूहिक विवाहाची परंपरा पुढे आली. लग्नावर होणार खर्च हा कमीत कमी व्हावा, या उद्देशातूनच विविध जातीच्या संघटना आपल्या जातीतील सर्वसामान्यांना व गरीब माणसाच्या मदतीला धावून आल्या आणि त्यातून सामूहिक विवाह सोहळे जन्माला आले. आपल्या जातीतील लोकांचा विवाहावर अतिरिक्त खर्च होऊ नये, पैशाची बचत व्हावी, म्हणून सामूहिक विवाह आयोजक संस्था मागील बर्‍याच वर्षांपासून कार्यान्वित होत्या. सुरुवातीला या संघटनांना मोठा पाठिंबा समाजाने दिला. एका सामूहिक विवाहात ५0 पेक्षाही जास्त वर- वधूंचे विवाह पार पाडले जात होते; मात्र अलिकडे परिस्थिती बदलू लागली आहे. सामूहिक विवाहात मुलामुलींचे विवाह करण्याचा कल कमी होत आहे. यामुळे आगामी काळात सामूहिक विवाहासाठी जोडपे मिळणार की नाही, अशी शंकाही निर्माण होत आहे.