शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बिबट्या, रोही मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

By admin | Updated: July 17, 2017 19:01 IST

घातपात की शिकार : जानेफळ शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : गावाला लागूनच असलेल्या मळी नामक शेत शिवारात बिबट्या व रोही हे दोन प्राणी १६ जुलै रोजी मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही प्राणी वाहत्या नाल्याकाठी दाट झुडपात पडलेले असल्याने हा घातपात की शिकार? अशी जोरदार चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. याचा उलगडा करण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे.जानेफळ गावाला लागूनच पुर्वेस मळी नामक शेत शिवार असून त्याला लागूनच वन विभागाची निंबा बिट आहे. तर गट क्र.१०५ मळी शिवारातील शाम मांगलाल गट्टाणी यांच्या मालकीच्या शेतातून एक मोठा पाण्याचा नाला गेलेला असून, त्याच्या काठावर एक बिबट्या व बाजुलाच रोही सुद्धा मृत अवस्थेत आढळून आला आहे. सदर पाण्याच्या नाल्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या काही लोकांना सदर दोन्ही प्राणी मृत अवस्थेत पडलेले दिसल्याने त्याची गेल्या २ ते ३ दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. सदर चर्चा वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी तसेच शिवसेना शहर प्रमुख शिवाजी मुरडकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहविल्याने जिल्हा उपवनसंरक्ष भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. पाटील, वनपाल एस.डी.परीहार आदींनी १६ जुलै २०१७ रोजी रात्री दरम्यान जानेफळ येथील मळी नामक शिवारातील शाम मांगीलाल गट्टाणी यांच्या शेतात धाव घेतली. त्यावेळी त्यांना कुजलेल्या अवस्थेत असलेला बिबट्या व रोही आढळून आले. त्यानंतर रात्रभर सर्च आॅपरेशन राबविण्यात येऊन १७ जुलै रोजी पशुवैद्यकीय अधिकारी डुघ्रेकर यांनी दोन्ही प्राण्यांचे शवविच्छेदन केले आहे. सदर घटनेतील बिबट्या व रोही हे कुजेपर्यंत वनविभागाला खबर नसल्याने तसेच सदर शेत मालकाने सुद्धा आपल्या शेतातील घटनेची माहिती वनविभागाला कळविली नसल्याने आश्चर्य व्यक्त होतआहे.याशिवारात सध्या रानडुकर, रोही हरीण, काळविट किंवा इतर काही जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार वनविभागासाठी फारसा गंभीर राहिलेला नाही. त्यामुळे सर्रास या वन्य प्राण्यांच्या शिकारी सुरु आहेत. मात्र वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याने बिबट्या व रोही सारख्या प्राण्यांचे जिवन सुद्धा धोक्यात आल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होते. सदर बिबट्या व रोही शेतातील झुडपात मृतावस्थेत पडलेले असल्याचे तसेच बिबट्याच्या पोटावर जळाल्याचा मोठा काळा डाग सुद्धा असलेला फोटो अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा सूरु असून यावरुन सदर घटना ही घातपाताचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे याचा छळा लावण्यासाठी वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करुन सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. सदर घटने प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा रिपोर्ट नं.५४६/१८ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९,३९ महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ९ (१) ड, ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपवनसंरक्षक भगत, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम.पाटी, वनपाल एस.डी.परिहार, पी.डी.सावळे, एस.डी.नागरे आदी करीत आहेत.