शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

सर्वांवर प्रेम करणे शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:25 IST

खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.सावजींनी सांगितले जीवनशैली बदलून आयुष्य वाढविण्याचे उपायतरुणाई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.येथील कोल्हटकर स्मारकमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘निरोगी राहा, दीर्घायुषी बना’ या विषयावर  व्याख्यान झाले. यावेळी नगराध्यक्ष अनिता डवरे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा, उद्योजक अनिल विकमसी, तरुणाई फाउंडेशन अध्यक्ष नारायण पिठोरे यांची उपस्थिती होती. वृक्ष पूजनाने व अतिथींना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ.सावजी यावेळी म्हणाले, की मानवी शरीराची रचना १२0 वर्षे जगण्याची आहे; मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आयुष्याला धोकादायक स्थितीत आणून ठेवले आहे. आपल्या संस्कृतीतील जुन्या आहार पद्धतीला फाटा दिल्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरत असताना आपण सहजपणे करता येण्यासारखे उपाय दुर्लक्षित करीत आहोत, वाढते वजन, व्यसनाधीनता व नैराश्य पसरलेल्या संपूर्ण समाजालाच आजाराची लागण झाली आहे. या सर्व व्याधींमधून बाहेर कसे पडावे, यावर डॉ.सावजींनी अनेक छोटे व सहज करण्यासारखे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक उमाकांत कांडेकर यांनी केले. तरुणाईचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले.

मुलांना नकार ऐकायची सवय लावाआपल्या मुलांना नाही ऐकायची सवय लावा, त्यांना सहजपणे सर्व उपलब्ध करून देत आपण त्याचे पुढील आयुष्य खराब करीत असतो. जीवनात संकट, अडचणी, आव्हान याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढली पाहिजे. आज अनेक पालक मुलांना गाड्या, मोबाइल व इतर अनावश्यक बाबी अगदी लहान वयात हातात देतात. ही मुले पुढे हमखास नैराश्यामध्ये पडतील. त्यांना अनेक आजार जडतील. त्यांना अभ्यासाचा ताण देऊ नका. इतरांशी स्पर्धा, तुलना करू नका, त्यांना भरपूर खेळू द्या, असेही ते म्हणाले.

का जगायचे हे शोधा..यावेळी डॉ.सावजी म्हणाले, की प्रत्येकाला आपल्या जीवनासाठी उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. फक्त मी व माझे केल्याने आजार बळावतात. का जगायचे, हे शोधा म्हणजे कसे जगायचे, हा प्रश्न पडणार नाही.-