शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

सर्वांवर प्रेम करणे शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:25 IST

खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.सावजींनी सांगितले जीवनशैली बदलून आयुष्य वाढविण्याचे उपायतरुणाई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.येथील कोल्हटकर स्मारकमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘निरोगी राहा, दीर्घायुषी बना’ या विषयावर  व्याख्यान झाले. यावेळी नगराध्यक्ष अनिता डवरे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा, उद्योजक अनिल विकमसी, तरुणाई फाउंडेशन अध्यक्ष नारायण पिठोरे यांची उपस्थिती होती. वृक्ष पूजनाने व अतिथींना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ.सावजी यावेळी म्हणाले, की मानवी शरीराची रचना १२0 वर्षे जगण्याची आहे; मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आयुष्याला धोकादायक स्थितीत आणून ठेवले आहे. आपल्या संस्कृतीतील जुन्या आहार पद्धतीला फाटा दिल्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरत असताना आपण सहजपणे करता येण्यासारखे उपाय दुर्लक्षित करीत आहोत, वाढते वजन, व्यसनाधीनता व नैराश्य पसरलेल्या संपूर्ण समाजालाच आजाराची लागण झाली आहे. या सर्व व्याधींमधून बाहेर कसे पडावे, यावर डॉ.सावजींनी अनेक छोटे व सहज करण्यासारखे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक उमाकांत कांडेकर यांनी केले. तरुणाईचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले.

मुलांना नकार ऐकायची सवय लावाआपल्या मुलांना नाही ऐकायची सवय लावा, त्यांना सहजपणे सर्व उपलब्ध करून देत आपण त्याचे पुढील आयुष्य खराब करीत असतो. जीवनात संकट, अडचणी, आव्हान याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढली पाहिजे. आज अनेक पालक मुलांना गाड्या, मोबाइल व इतर अनावश्यक बाबी अगदी लहान वयात हातात देतात. ही मुले पुढे हमखास नैराश्यामध्ये पडतील. त्यांना अनेक आजार जडतील. त्यांना अभ्यासाचा ताण देऊ नका. इतरांशी स्पर्धा, तुलना करू नका, त्यांना भरपूर खेळू द्या, असेही ते म्हणाले.

का जगायचे हे शोधा..यावेळी डॉ.सावजी म्हणाले, की प्रत्येकाला आपल्या जीवनासाठी उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. फक्त मी व माझे केल्याने आजार बळावतात. का जगायचे, हे शोधा म्हणजे कसे जगायचे, हा प्रश्न पडणार नाही.-