शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

सर्वांवर प्रेम करणे शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 23:25 IST

खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

ठळक मुद्देडॉ.सावजींनी सांगितले जीवनशैली बदलून आयुष्य वाढविण्याचे उपायतरुणाई फाउंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन डॉ.अविनाश सावजी यांनी केले. तरुणाई फाउंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.येथील कोल्हटकर स्मारकमध्ये २२ ऑगस्ट रोजी ‘निरोगी राहा, दीर्घायुषी बना’ या विषयावर  व्याख्यान झाले. यावेळी नगराध्यक्ष अनिता डवरे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा, उद्योजक अनिल विकमसी, तरुणाई फाउंडेशन अध्यक्ष नारायण पिठोरे यांची उपस्थिती होती. वृक्ष पूजनाने व अतिथींना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ.सावजी यावेळी म्हणाले, की मानवी शरीराची रचना १२0 वर्षे जगण्याची आहे; मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आयुष्याला धोकादायक स्थितीत आणून ठेवले आहे. आपल्या संस्कृतीतील जुन्या आहार पद्धतीला फाटा दिल्याने अनेक आजार ओढवून घेतले आहेत. हृदयविकार, कॅन्सर यासारख्या आजारांवर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान वापरत असताना आपण सहजपणे करता येण्यासारखे उपाय दुर्लक्षित करीत आहोत, वाढते वजन, व्यसनाधीनता व नैराश्य पसरलेल्या संपूर्ण समाजालाच आजाराची लागण झाली आहे. या सर्व व्याधींमधून बाहेर कसे पडावे, यावर डॉ.सावजींनी अनेक छोटे व सहज करण्यासारखे उपाय सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक उमाकांत कांडेकर यांनी केले. तरुणाईचे सचिव राजेंद्र कोल्हे यांनी आभार मानले.

मुलांना नकार ऐकायची सवय लावाआपल्या मुलांना नाही ऐकायची सवय लावा, त्यांना सहजपणे सर्व उपलब्ध करून देत आपण त्याचे पुढील आयुष्य खराब करीत असतो. जीवनात संकट, अडचणी, आव्हान याचा सामना करण्याची त्यांची शक्ती वाढली पाहिजे. आज अनेक पालक मुलांना गाड्या, मोबाइल व इतर अनावश्यक बाबी अगदी लहान वयात हातात देतात. ही मुले पुढे हमखास नैराश्यामध्ये पडतील. त्यांना अनेक आजार जडतील. त्यांना अभ्यासाचा ताण देऊ नका. इतरांशी स्पर्धा, तुलना करू नका, त्यांना भरपूर खेळू द्या, असेही ते म्हणाले.

का जगायचे हे शोधा..यावेळी डॉ.सावजी म्हणाले, की प्रत्येकाला आपल्या जीवनासाठी उदात्त हेतू असणे आवश्यक आहे. फक्त मी व माझे केल्याने आजार बळावतात. का जगायचे, हे शोधा म्हणजे कसे जगायचे, हा प्रश्न पडणार नाही.-