शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

गेल्यावर्षीचे पीक कर्जदार पुनर्गठनास पात्र!

By admin | Updated: June 8, 2016 02:18 IST

बॅकांनी माहिती फलकावर कागदपत्रांचा तपशील देण्याचे जिल्हाधिका-यांनी दिले आदेश.

बुलडाणा : गतवर्षी खरीप हंगामामध्ये पीक कर्ज घेतलेले शेतकरी या हंगामासाठी कर्जाचे पुनर्गठन करण्यास पात्र आहेत. अशा शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे त्वरित पुनर्गठन बँकांनी पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिले आहेत. या वर्षाचा खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकरी खरिपातील पेरणीच्या तयारीला लागला आहे. शेतकरी खते, बियाणे खरेदी करीत आहेत. त्यामुळे पीक कर्जाचा प्रश्न रेंगाळत राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने निर्देश दिले आहेत.खरीप हंगाम-२0१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या ज्या शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन २0१५ मध्ये झाले नाही, तसेच पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी पुनर्गठनास अपात्र आहेत; मात्र २0१५ मध्ये पीक कर्ज घेतलेले सर्व शेतकरी पुनर्गठनास पात्र आहेत. ज्या शेतकर्‍यांनी कोणत्याही बँकेकडून पीक कर्ज घेतलेले नाही, ते नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र आहेत. पात्र शेतकर्‍यांचे बँकांनी त्वरित पुनर्गठन करून नवीन पीक कर्ज द्यावे. अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेनेही पीक कर्ज वाटपास सुरुवात केली असून, ज्या ग्रामसेवा सहकारी संस्थांचे थकीत पीक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अजिसपूर येथील ग्रामसेवा संस्थेने मंगळवारपर्यंंत ४ लाख ८0 हजारांचे तर बुलडाणा ग्रामसेवा संस्थेने १ लाख ९७ हजाराचे पीक कर्ज वाटप केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.