शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी हाेत आहे. किनगाव जट्टूसह परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही अळयांचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणापासून पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगाम चांगला येईल, असे वाटत असताना अतिवृष्टीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला. खरीप हंगामात लागवडीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही. दरम्यान, परतीच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव, विहिरीत जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, आदी पिके पेरली. त्यांना महागडी रासायनिक खते दिली. या पिकाची वाढसुद्धा चांगली झाली असून, हरभरा पिकाला घाटेसुद्धा लागले आहे. परंतु, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी कीटकनाशके फवारुनही अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.