शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हरभरा पिकावर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किनगाव जट्टू : पाेषक वातावरणामुळे जाेमात असलेल्या हरभरा पिकावर अळ्यांनी आक्रमण केल्याने किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी हाेत आहे. किनगाव जट्टूसह परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही अळयांचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणापासून पाऊस चांगला झाल्याने खरीप हंगाम चांगला येईल, असे वाटत असताना अतिवृष्टीने कहर केल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला. खरीप हंगामात लागवडीला लागलेला खर्चही वसूल झाला नाही. दरम्यान, परतीच्या पावसामुळे नदी-नाले, तलाव, विहिरीत जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, आदी पिके पेरली. त्यांना महागडी रासायनिक खते दिली. या पिकाची वाढसुद्धा चांगली झाली असून, हरभरा पिकाला घाटेसुद्धा लागले आहे. परंतु, वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी कीटकनाशके फवारुनही अळी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.