शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

साेयाबीन उगवण क्षमता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवा : श्वेता महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

चिखली : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत गतवर्षी झालेल्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, यंदा सोयाबीन ...

चिखली : तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेबाबत गतवर्षी झालेल्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, यंदा सोयाबीन उगवण क्षमता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी, तसेच कुठेही खते व बियाणे कमी पडणार नाही आणि बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना आमदार श्वेता महाले यांनी तालुक्याच्या खरीपपूर्व आढावा सभेत दिल्या.

चिखली तालुक्याची सन २०२१-२२ खरीप पूर्व आढावा सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार श्वेता महाले होत्या. या सभेत तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांनी कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेबाबत माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन विक्री न करता, ते बियाणे म्हणून वापरावे व शिल्लक बियाणे असल्यास व्यापाऱ्यांना न विकता इतर शेतकऱ्यांना बियाणे म्हणून विकावे, असे आवाहन केले. दरम्यान, तालुक्याला लागणाऱ्या सोयाबीन बियाणे व उपलब्धतेबाबत सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. बियाणे उगवण क्षमता चाचणी केल्याशिवाय पेरणी करू नये, बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, बीबीएफद्वारे पेरणी अथवा पट्टा पद्धतीने पेरणी, सोयाबीन चक्रिभुंगा व खोडमाशी नियंत्रण मोहीम, कापूस पीक एक गाव एक वाण, गुलाबी बोंड अळी नियंत्रण मोहीम, तूर पिकामध्ये ३०, ४५ व ६० दिवसांनी शेंडे खुडने, मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण मोहीम, विकेल ते पिकेल अभियान, खते व बियाणे आवश्यकता व उपलब्धता बाबत माहिती या सभेत देण्यात आली. दरम्यान, पीक कर्ज वाटपाबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनी पीक कर्ज जूनपूर्वी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यासह सर्व विभागांनी कोविड १९ परिस्थितीत योग्य नियोजन करून खरीप हंगाम यशस्वी करण्याबाबत सांगितले. सभेस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे, गटविकास अधिकारी जाधव व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.