शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी हजर नसतानाही दिवे सुरूच!

By admin | Updated: May 4, 2017 00:36 IST

मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विजेचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे दिसून आले.

मेहकर : जीवनामध्ये वीज हा महत्त्वाचा घटक बनला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात अथवा ठिकाणी वीज ही आवश्यक गरज झाली आहे. विजेचा वापर हा आवश्यकतेनुसार करावा. तसेच शक्य तेवढ्या कमी प्रमाणात विजेचा वापर करावा, असे वीज वितरण कंपनीकडून वेळोवेळी सांगण्यात येते. विजेचा वापर कमी करावा, यासाठी शासनाकडून जनजागृतीपर विविध उपक्रम तथा सूचना देण्यात येतात; परंतु मेहकर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातच विजेचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे दिसून आले.‘लोकमत’च्यावतीने ३ मे रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. यावेळी मेहकर येथील वीज वितरणच्या उपविभागीय कार्यालयात कार्यालयातील प्रत्येक कक्षाचे लाइट हे चालू होते. त्याचबरोबर खुर्चीवर अधिकारी तथा कर्मचारी नसतानाही पंखे, लाइट सुरू होते. तसेच उपविभागीय अभियंता कलोरे यांचे कार्यालयाला ११.५ मिनिटांनी कुलूप होते. कार्यालयात लाइट लावण्याची दिवसा काही गरज नसतानाही प्रत्येक कार्यालयातील लाइट हे सुरूच होते. शासकीय वेळेवर अधिकारी तथा कर्मचारी आलेले नव्हते. अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. विविध कामासाठी येणारे लोक ताटकळत बसले होते. घरगुती, कृषी व्यवसायासाठी कनेक्शन देताना त्या ग्राहकाला सूचना देण्यात येतात, की आपला विजेचा वापर कमी प्रमाणात करावा. जर अशा ग्राहकांनी विजेचा वापर जास्त केला, तर त्याला वीज वापराचे जादा बिले देण्यात येतात. परंतु, वीज कंपनीच्या कार्यालयात विजेचा गैरवापर होत आहे. इतर शासकीय कार्यालयात सारखीच परिस्थितीशहरामध्ये विविध विभागाचे जवळपास ३० ते ३५ शासकीय कार्यालये आहेत. येथेही विनाकारण वापर होताना दिसत आहे. अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर गेले असता, तसेच इतर कामासाठी बाहेर गेले असता त्या कार्यालयातील पंखे व लाइटसुद्धा दिवसभर सुरूच असतात. त्यामुळे खासगी लोकांसाठी वीज वितरण कंपनीचे नियम असतात. मात्र, यांच्याकडूनच विजेचा गैरवापर होत असल्याने यांना नियम लागू नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.