शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
4
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
5
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
6
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
7
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
8
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
9
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
11
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
12
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
13
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
14
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
15
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
16
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
17
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
18
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
19
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
20
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

आमखेड येथील तलाव फुटला,शेतात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले ...

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या भागातील गांगलगाव भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड येथील पाझर तलाव फुटला आहे. या भागातील सर्वच नदी नाल्याने पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तलाव फुटल्याने चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़

चिखली तालुक्याला पावसाची मोठी प्रतीक्षा होती. २८ जूनरोजी पाऊस सर्वत्र दमदार बरसल्याने पेरणी रखडलेले शेतकरी सुखावले आहेत. मात्र, ज्या भागात आधी पेरण्या झालेल्या होत्या व जिथे पावसाची आवश्यकता नव्हती, त्या भागात आज ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामध्ये मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, पाटोदा, सावरखेड, एकलारा, वरखेड, भोरसा-भोरसी, गांगलगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे दीड ते दोन तास धुव्वाधार पाऊस कोसळल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आधी पेरणीयोग्य पाऊस झालेला होता. त्यामुळे या भागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, तसेच नुकतेच बियाणे अंकुरलेल्या शेतात सर्वत्र पाणी साचले असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

भाेगावती नदीला महापूर

गांगलगाव शिवरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आमखेड येथील मध्यम स्वरूपाचा पाझर फुटला असून, मातीचा बांध वाहून गेला आहे. या तलावाच्या फुटण्यामुळे गावास कोणताही धोका नव्हता मात्र, त्याच्या फुटण्याने तलावाखालील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, आजच्या पावसाचे कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाझर तलाव फुटल्याने लव्हाळा साखरखेर्डा मार्गावरील भोगावती नदीला महापूर आला होता.

माेहाडी येथे १०० शेतमजूर अडकले

मेहकर तालुक्यातील आमखेड येथील तलाव फुटल्याने मोहाडी येथील १०० हून अधिक शेतकरी आणि शेतमजूर अडकले आहेत. सरपंच अशोक रिंढे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, बबनराव रिंढे, नंदकिशोर रिंढे, विलास आबा रिंढे यासह गावातील नागरिक अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी थांबून त्यांना लव्हाळामार्गे गावात आणण्यासाठी प्रयत्न करीत हाेते़