शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आमखेड येथील तलाव फुटला,शेतात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले ...

चिखली : तालुक्यातील पूर्वेकडील भागात २८ जूनला सायंकाळी पाचच्यासुमारास सुरुवात झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या भागातील गांगलगाव भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड येथील पाझर तलाव फुटला आहे. या भागातील सर्वच नदी नाल्याने पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तलाव फुटल्याने चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेकडाे हेक्टरवरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़

चिखली तालुक्याला पावसाची मोठी प्रतीक्षा होती. २८ जूनरोजी पाऊस सर्वत्र दमदार बरसल्याने पेरणी रखडलेले शेतकरी सुखावले आहेत. मात्र, ज्या भागात आधी पेरण्या झालेल्या होत्या व जिथे पावसाची आवश्यकता नव्हती, त्या भागात आज ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. यामध्ये मंगरूळ नवघरे, डोंगरगाव, पाटोदा, सावरखेड, एकलारा, वरखेड, भोरसा-भोरसी, गांगलगाव व परिसरातील गावांमध्ये सुमारे दीड ते दोन तास धुव्वाधार पाऊस कोसळल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात आधी पेरणीयोग्य पाऊस झालेला होता. त्यामुळे या भागातील खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाहून गेले, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, तसेच नुकतेच बियाणे अंकुरलेल्या शेतात सर्वत्र पाणी साचले असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

भाेगावती नदीला महापूर

गांगलगाव शिवरात कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आमखेड येथील मध्यम स्वरूपाचा पाझर फुटला असून, मातीचा बांध वाहून गेला आहे. या तलावाच्या फुटण्यामुळे गावास कोणताही धोका नव्हता मात्र, त्याच्या फुटण्याने तलावाखालील शेती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, आजच्या पावसाचे कुठेही जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाझर तलाव फुटल्याने लव्हाळा साखरखेर्डा मार्गावरील भोगावती नदीला महापूर आला होता.

माेहाडी येथे १०० शेतमजूर अडकले

मेहकर तालुक्यातील आमखेड येथील तलाव फुटल्याने मोहाडी येथील १०० हून अधिक शेतकरी आणि शेतमजूर अडकले आहेत. सरपंच अशोक रिंढे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे, बबनराव रिंढे, नंदकिशोर रिंढे, विलास आबा रिंढे यासह गावातील नागरिक अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी थांबून त्यांना लव्हाळामार्गे गावात आणण्यासाठी प्रयत्न करीत हाेते़