शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा शहरात स्वच्छतेचा अभाव, नाल्या तुंडूब भरल्या

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्‍याने तुडूंब भरल्या आहेत.

देऊळगावराजा : देऊळगावराजा नगर पालिकेच्या गलथान कारभारात अद्यापही सुधारणा होत नसून ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्‍याने तुडूंब भरल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने त्वरीत नाल्या साफ करण्याची मागणी होत आहे.

शहरात नगर पालिकेचे एकूण चार प्रभाग आहेत आणि सतरा नगरसेवक शहराचे प्रतिनिधीत्व करतात. शहरवासियांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतांना त्यादृष्टीने कारभार होत नाही. शहरातील नाल्यांची स्थिती स्वच्छतेच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. मृग नक्षत्रानंतर कोणत्याही क्षणी पाऊस येवू शकतो. त्यापुर्वी नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी आणि कचरा साफ करण्याचे कामाचा नगर पालिकेला विसर पडल्याचे दिसून येते. पावसाचे आगमन झाल्यानंतर याच अस्वच्छतेमुळे रोगराई निर्माण होवून नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला बाधा पोहचू शकते. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिवसेनेचे नगरसेवक नंदन खेडेकर यांनी मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिल्यानंतरही नाल्यांची स्वच्छता करण्याची तत्परता न.प.ने दाखविली नाही. नाल्यांमध्ये साचलेले घाणपाणी, हवेमुळे त्यता जावून पडणारा कचरा, महिनोमहिने स्वच्छता होत नसल्याने अक्षरश: या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मेनरोड वरील काही दुकानात खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर दुर्गंधीमुळे ग्राहकांचा जीव कासावीस होतो. तर दुकानदारांना या बाबीचा किती त्रास होत असेल. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत भागातही घराच्या समोर हीच समस्या असल्याने वयोवृध्द नागरिक व बाल गोपाळांना हा त्रास मुकाटपणे सोसावा लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सुस्तावलेली नगरपालिका साफसफाईची मोहिम कधी सुरू करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.